राजस्थानमध्ये लग्नसराईत २५ हजार कोटींची उलाढाल!

जीएसटी कौन्सिलने वस्तूंवरील कर कमी केल्याचा थेट परिणाम


जयपूर : लग्न म्हटलं की संगीताचे सुस्वर, सजवलेला मंडप, घोड्यावर स्वार झालेला वर आणि हातावर मेंदी रचलेली वधू ... असं सगळं वातावरण असतं. लग्न एकदाच करायचं असतं त्यामुळे सगळ्या हौसमौज करून घेण्याच्या नादात खर्चाकडे पाहिलं जात नाही. परंतु नंतर मात्र हिशेब करताना... घाम फुटतो. परंतु आता धुमधडाक्यात लग्न बिनधास्त करता येणे शक्य आहे. यावेळी, लग्नसराईमुळे खिशावर पडणारा भार थोडा कमी होणार आहे. अलिकडेच जीएसटी कौन्सिलने वस्तूंवरील कर कमी केल्याचा थेट परिणाम आता लग्नसराईंवर होत आहे. आता अगदी बँड-बाजापासून ते वरातीपर्यंतच्या प्रत्येक खर्चात बचत होण्याची शक्यता आहे. २२ सप्टेंबरपासून लागू झालेल्या नवीन दरांनुसार, सरकारने अनेक दैनंदिन वस्तूंवरील जीएसटी कमी केला आहे.



बाजारपेठ अधिक गतिमान होईल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल


देशातील लग्न उद्योग सुमारे ४ लाख कोटी रुपयांचा आहे. यात जीएसटी कपातीचा परिणाम एकाच वेळी अनेक क्षेत्रांवर दिसून येणार आहे. जसे - कॅटरिंग, हॉटेल्स, दागिने, प्रवास, कार्यक्रम व्यवस्थापन आणि भेटवस्तूंच्या वस्तू. ही क्षेत्रं आता अधिक सक्रिय होतील. अर्थतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की यामुळे खर्च करण्याची क्षमता वाढेल आणि मागणी-चलित विकासाला चालना मिळेल. ऑल इंडिया टेंट डेकोरेटर वेलफेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी जिंदाल म्हणतात की, देवुथनी ते देवशयनी एकादशीपर्यंत राजस्थानमध्ये सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होतो. पूर्वी लग्न दोन दिवस चालायचे, पण आता सुफी रात्रींची भर पडल्याने ते तीन दिवसांचे झाले आहे. हळूहळू, हा उद्योग वाढत आहे.



आता काय स्वस्त होईल?


पनीर, मिठाई, सुकामेवा, पास्ता, बिस्किटे : जीएसटी १२-१८% वरून ५% पर्यंत कमी केला, लग्नाच्या मेनूवर ७-१२% बचत झाली.
 हॉटेल रूम (₹१००१- ₹७५०० भाडे): जीएसटी १८% वरून ५% पर्यंत कमी केला. ज्यामुळे पाहुण्यांची सोय करणे सोपे झाले.
 दागिने, कॅटरिंग, इव्हेंट मॅनेजमेंट: जीएसटी १८% वरून ५% पर्यंत कमी केला, ज्यामुळे भेटवस्तू स्वस्त झाल्या.
मेकअप: मेकअप सेवांवर जीएसटी १८% वरून ५% पर्यंत कमी झाला. त्यामुळे मेकअप पॅकेज १५ ते २० टक्क्यांनी स्वस्त झाले.
 कार (मध्यम श्रेणी): लग्नासाठी गाड्या बुक करण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे आणि यावेळी, विशेषतः कर कपातीमुळे, मध्यम श्रेणीच्या गाड्यांची मागणी वाढली आहे.

Comments
Add Comment

‘वनतारा’च्या उद्दिष्टांचे जागतिक स्तरावर पुनरुज्जीवन

सीआयटीईएसच्या बैठकीत भारताच्या भूमिकेला मान्यता जामनगर : उझबेकिस्तानमधील समरकंद येथे नुकतेच पार पडलेल्या

रेल्वेमध्ये ‘हलाल’ प्रमाणित अन्न विकण्याची अधिकृत तरतूद नाही

'एनएचआरसी'च्या नोटिसीला भारतीय रेल्वे बोर्डाचे स्पष्टीकरण नवी दिल्ली  : रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या

नियामक रचनेत फेरफार करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाने आरोग्य अधिकाऱ्यांना दिली लाच! ईडीच्या छापेमारीत प्रकरण आले उजेडात

मुंबई: विशिष्ट अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांना तसेच, राष्ट्रीय वैद्यकीय

लाल किल्ला पर्यटकांसाठी १० दिवस बंद

नवी दिल्ली : दिल्लीचा ऐतिहासिक लाल किल्ला येत्या डिसेंबर महिन्यात १० दिवसांसाठी सर्वसामान्य पर्यटकांसाठी बंद

बलाढ्य भारताच्या तीन भूभागांवर टीचभर नेपाळचा दावा

१०० रुपयांच्या नोटेवर दाखवले भारताचे तीन भाग मुंबई : विशाल आणि बलाढ्य अशी जगाच्या नकाशावर ओळख असलेल्या

‘घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का ? ’

नवी दिल्ली : देशभर सुरू असलेल्या मतदार यादी पुनिरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर