फ्रॅक्चर होऊनही जिद्द कायम!

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पटकावला १५ वा क्रमांक


मुरबाड  : अपयश आणि संघर्षाने खचून न जाता, प्रत्येक अडथळ्यावर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे कर्जत तालुक्यातील ऐनाचीवाडी येथील नयन विठ्ठल वाघ यांनी सिद्ध केले आहे. अत्यंत बिकट परिस्थितीतून मार्ग काढत, आदिवासी समाजातील नयन वाघ यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गातून १५ वा क्रमांक मिळवून अधिकारी पदावर झेप घेतली आहे. फ्रॅक्चर होऊनही त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर २०२४ मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा दिली.


नयन यांचा शालेय आणि स्पर्धा परीक्षांचा प्रवास खूपच खडतर राहिला. लहानपणी शिक्षणात रुची नसल्यामुळे ते सातवीच्या परीक्षेत आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेत तब्बल दोन वेळा नापास झाले होते. मोलमजुरी करत असताना २०११ मध्ये त्यांचे जीवन बदलले. प्राथमिक शिक्षक पुंडलिक कंटे यांनी त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि दहावीची परीक्षा पुन्हा देण्यास प्रेरित केले.


पोलीस भरतीसाठी तयारी:


२०१६ ते २०१८ दरम्यान त्यांनी पोलीस भरतीची तयारी केली, पण यश मिळाले नाही. २०१९ मध्ये ते एमपीएससीकडे वळले. २०२२ मध्ये त्यांची पीएसआयच्या शारीरिक चाचणीसाठी निवड झाली, परंतु धावताना त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यांचे पोलीस होण्याचे स्वप्न भंगले. पायाला गंभीर दुखापत होऊनही नयन यांनी हार मानली नाही. वॉकर आणि काठीच्या आधाराने ते अभ्यास करत राहिले आणि याच परिस्थितीत त्यांनी २०२४ मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा दिली.


नयन वाघ यांच्या या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा त्याग आणि पाठिंबा मोलाचा ठरला. त्यांचे वडील पॅरालिसिसचा त्रास असथी आणि हात फ्रॅक्चर झालेला असतानाही काम करत राहिले. त्यामुळे नयन यांना प्रेरणा मिळाली. महत्त्वाचे म्हणजे, नयन यांच्या पत्नीने माहेरी राहून टेलरिंगचे काम करत आर्थिक हातभार लावला. त्यांच्या लहान भावाने फार्म हाऊसवर काम करून घरची जबाबदारी सांभाळली आणि आर्थिक मदतही केली. या कुटुंबाचे कष्ट कायमस्वरूपी कमी करण्यासाठी आपण अधिकारी होणे गरजेचे आहे, या निर्धारानेच नयन यांनी अभ्यास केला आणि अखेरीस आपले स्वप्न पूर्ण केले.


नयन वाघ यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. ते म्हणाले की, "संकटांचा काळ किंवा वाईट परिस्थितीचा काळ हा कधीच मोठा नसतो, फक्त त्या काळामध्ये टिकून राहायचं असतं आणि सकारात्मक राहायचं असते." नयन वाघ यांनी आपल्या संघर्षातून इतरांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे, की जिद्द आणि सातत्य असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही.

Comments
Add Comment

Eknath Shinde : ठाणे क्लस्टर योजनेला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

वागळे इस्टेट, किसननगर, कोपरी क्लस्टर महाप्रीतकडून एमएसआरडीसीकडे देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे

Central Railway Power Block Update : मध्य रेल्वेवर पॉवर ब्लॉक; ६ जूनला अनेक गाड्या रद्द, वेळापत्रकात बदल, लोकल सेवांवरही परिणाम!

कल्याण (Mumbai Central Railway Block) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (Electronic Interlocking)

No-Parking Restrictions Ulhasnagar Roads : ठाणेकरांनो लक्ष द्या! उल्हासनगरमधील 'या' ५ मुख्य रस्त्यांवर २४ तास नो-पार्किंग; वाहतूक पोलिसांचा कडक निर्णय

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात (Ulhasnagar) दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी ठाणे वाहतूक

Thane News : दिवा येथून ७ वर्षीय चिमुकली बेपत्ता; ३६ तासांच्या प्रयत्नानंतर ठाणे पोलिसांना यश

ठाणे : ठाणे (Thane News) जिल्ह्यातील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय मुलीचा अवघ्या ३६ तासांत शोध घेण्यात ठाणे

Bhiwandi Water : भिवंडीच्या १५ लाख लोकांना २७३ एमएलडी पाणी मिळणार, ४२६ कोटींचा पाणी प्रकल्प

भिवंडी : अमृत अभियान २.० उपक्रमांतर्गत भिवंडी-निझामपूर शहराच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ लाख

Actor Sharad Ponkshe : सावरकरांचे विचार विश्व कल्याणाचे - अभिनेते शरद पोंक्षे

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचे विचार विश्वकल्याणाचे आहेत. त्यांचे