पार्थ पवार जमीन घोटाळा: अजितदादा काय म्हणतात, प्रत्यक्ष 'ऐका'!

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठले असताना, अजित पवार यांनी या प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामुळे या प्रकरणाला एक नवे 'ट्विस्ट' मिळाले आहे.


पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यात १८०० कोटी रुपये किंमतीची जमीन केवळ ३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर, नियमानुसार ६ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरणे अपेक्षित असताना, फक्त ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरल्याचेही उघड झाले होते.



या आरोपांनंतर सुरुवातीलाच आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यांनी आता जो खुलासा केला आहे, त्याने विरोधकांनाही विचार करायला लावला आहे.


अजित पवार यांनी स्पष्ट केले, "माझा या व्यवहाराशी काही संबंध नाही आणि मला याबद्दल कोणतीही माहिती नाही. पण आता मी सांगतोय, या व्यवहारामध्ये आतापर्यंत एकही रुपया कोणालाही देण्यात आलेला नाही."


त्यांनी पुढे मोठी घोषणा करत सांगितले की, या प्रकरणातील सर्व व्यवहार रद्द करण्यात आले आहेत. सर्व दस्तऐवज (डॉक्युमेंट्स) देखील रद्द करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती गठीत करण्यात आली असून, महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितीला देण्यात आले आहेत.


यावेळी अजित पवार यांनी अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला. "माझ्या नावाचा वापर केला तर ते मला चालणार नाही," असे ते म्हणाले. "कोणही असो, अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली येऊ नये," अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.


पुण्याच्या १८०० कोटींच्या जमिनीचा ३०० कोटींमध्ये झालेला हा कथित व्यवहार आता अजितदादांनी पूर्णपणे रद्द केल्यामुळे, विरोधकांनी लावलेले आरोप आणि शासकीय नियमांचे उल्लंघन या दोन्ही गोष्टींवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका; आजच्या बैठकीत काय घडलं ?

(Marathi Language Compulsory Taxi-Auto ) : आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य