पार्थ पवार जमीन घोटाळा: अजितदादा काय म्हणतात, प्रत्यक्ष 'ऐका'!

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठले असताना, अजित पवार यांनी या प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामुळे या प्रकरणाला एक नवे 'ट्विस्ट' मिळाले आहे.


पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यात १८०० कोटी रुपये किंमतीची जमीन केवळ ३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर, नियमानुसार ६ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरणे अपेक्षित असताना, फक्त ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरल्याचेही उघड झाले होते.



या आरोपांनंतर सुरुवातीलाच आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यांनी आता जो खुलासा केला आहे, त्याने विरोधकांनाही विचार करायला लावला आहे.


अजित पवार यांनी स्पष्ट केले, "माझा या व्यवहाराशी काही संबंध नाही आणि मला याबद्दल कोणतीही माहिती नाही. पण आता मी सांगतोय, या व्यवहारामध्ये आतापर्यंत एकही रुपया कोणालाही देण्यात आलेला नाही."


त्यांनी पुढे मोठी घोषणा करत सांगितले की, या प्रकरणातील सर्व व्यवहार रद्द करण्यात आले आहेत. सर्व दस्तऐवज (डॉक्युमेंट्स) देखील रद्द करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती गठीत करण्यात आली असून, महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितीला देण्यात आले आहेत.


यावेळी अजित पवार यांनी अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला. "माझ्या नावाचा वापर केला तर ते मला चालणार नाही," असे ते म्हणाले. "कोणही असो, अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली येऊ नये," अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.


पुण्याच्या १८०० कोटींच्या जमिनीचा ३०० कोटींमध्ये झालेला हा कथित व्यवहार आता अजितदादांनी पूर्णपणे रद्द केल्यामुळे, विरोधकांनी लावलेले आरोप आणि शासकीय नियमांचे उल्लंघन या दोन्ही गोष्टींवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Nanded Suicide : स्टेटस ठेवलं अन् शिक्षकाची दोन मुलांसह आत्महत्या; पोलीस तपास सुरु

नांदेडमध्ये शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे खळबळ नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून

Jalgaon : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटात भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar–Jalgaon Highway) भीषण अपघात घडल्याची माहिती समोर

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले