BSE Stock Surge: निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यावर बीएसई शेअर ८% उसळला

प्रतिनिधी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फ्युचर अँड ऑप्शन्स (F&O) बद्दल केलेल्या वक्तव्यावर शेअर बाजाराने बीएसई (Bombay Stock Exchange BSE)शेअरला मोठा प्रतिसाद दिला आहे. सकाळी सत्र सुरूवातीला शेअर ४% व दुपारपर्यंत ८% पातळीवर उसळला आहे. विशेषतः कालच्या वक्तव्यानंतर शेअर बुलिश पँटर्नवर गेल्याचे स्पष्ट झाले. काल निर्मला सीतारामन यांनी एका कार्यक्रमात एफ अँड ओ वरील बंदीचा कुठलाही विचार नसल्याचे अथवा निर्बंध घालण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र याविषयी गुंतवणूकदारांमध्ये सजगता आवश्यक आहे असे म्हटले आहे.


डेरीएटीव गुंतवणूकीत गुंतवणूकदारांना रोखण्याचा विचार नाही असे सीतारामन म्हणाल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भाग घेताना डेरिएटीव प्रकारातील गुंतवणूकीत जोखीम लक्षात घेण्याची गरज असल्याचेही विधान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी केले. 'सजगता' अत्यंत महत्वाची असल्याचे निर्मला सीतारामन यांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळे सरकारने केलेल्या सकारात्मक विधानानंतर डेरिएटिव गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्यामध्ये आज बाजारात मोठा प्रतिसाद बीएसई शेअरला मिळाला आहे. दुपारी १.५६ वाजेपर्यंत शेअर्समध्ये थेट ८% उसळत २६५१.८० पातळीवर पोहोचला आहे.


सेबीच्या ताज्या आकडेवारीनुसार,आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ९१% वैयक्तिक एफ अँड ओ व्यापाऱ्यांना निव्वळ तोटा झाला आहे. जो एकूण १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होता. अहवालात असे नुकसान अन्यथा जबाबदार गुंतवणूक आणि दीर्घकालीन भांडवल निर्मितीला कारणीभूत ठरू शकले असते असे अधोरेखित करण्यात आले आहे.हेजिंग, सट्टेबाजी आणि मध्यस्थीसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या या एफ अँड ओ साधनांमध्ये उच्च जोखीम असते. गुंतवणूकदारांना बाजाराची स्पष्ट समज आवश्यक असते. वाढत्या सट्टेबाजीला तोंड देण्यासाठी, बाजारात सेबीने यापूर्वी स्थिती मर्यादा आणि मार्जिन आवश्यकतांबद्दल कडक नियम लागू केले होते. आतापर्यंत बीएसई शेअरने बाजारात चांगली कामगिरी केली आहे.


उपलब्ध माहितीनुसार, गेल्या एक महिन्यापासून या शेअरने १४% परतावा दिला असून महिन्यातील आधारे २०% घसरण झाली आहे. तर या आर्थिक वर्षात शेअरने गुंतवणूकदारांना ६१% परतावा (Returns) दिले आहेत.

Comments
Add Comment

Rajnath Singh : पाकिस्तानविरुद्ध दीर्घ लढ्यास भारत तयार – राजनाथ सिंह

नवी दिल्ली : भारताने ऑपरेशन सिंदूर हे आपल्या अटींवर स्वेच्छेने थांबवले होते आणि गरज पडल्यास पाकिस्तान विरुद्ध

Women's T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; अशी केली जाणार निवड

मुंबई : २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १२ जून ते ५ जुलै

Summer Special Trains : प्रवाशांच्या मागणीमुळे LTT वरून खास, मुंबई – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई : प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी

Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या संपर्क केंद्रात भारतीय सांकेतिक भाषा सहाय्य सेवेची सुरुवात

मुंबई : भारताची आंतरराष्ट्रीय बँक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बँक) आपल्या संपर्क केंद्रात व्हिडीओ

Kalyan and Badlapur Power Blocks : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवर उद्या आणि परवा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स

मुंबई : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवरील ओएचई (OHE) कामासाठी अप व डाउन दक्षिण-पूर्व मार्गावर दिनांक

Missing link : मिसिंग लिंकची गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद; जगातला सर्वात रुंद बोगदा म्हणून रेकॉर्ड केला नावावर

मुंबई : भारतीय इंजिनिअरींगचा अदभूत चमत्कार असलेला आणि मुंबई पुणे अंतर कमी करणारा सर्वात महत्वाच्या पुलाची आता