थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे. थंड वारे, कोरडी हवा आणि स्क्रीनसमोर वाढलेला वेळ या सगळ्यांचा परिणाम थेट डोळ्यांवर होत असून डोळे कोरडे पडणे, लालसरपणा, चुरचुरणे आणि दृष्टी धूसर होणे या तक्रारी वाढू शकतात.


हिवाळ्याच्या मोसमात अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्यामुळे थंडी काहीशी लांबली आहे. मात्र थंडीच्या दिवसात डोळ्यांची काळजी तितकीच महत्त्वाची आहे. या काळात हवेतील आर्द्रता कमी होते. त्यामुळे डोळ्यांचा नैसर्गिक ओलावा कमी होतो. यासाठी घरात ह्यूमिडिफायर वापरणे, पुरेसे पाणी पिणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आर्टिफिशियल टिअर्स (कृत्रिम अश्रू) वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.


कोरड्या हवेमुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडू शकते


''थकवा आणि झोपेअभावी डोळ्यांत कोरडेपणा येतो. दररोज किमान सात ते आठ तासांची झोप घेतल्यास डोळ्यांना विश्रांती मिळते आणि ते ताजेतवाने राहतात. डोळ्यांत खाज, लालसरपणा, पाणी येणे किंवा दृष्टी धूसर होणे या तक्रारी वाढल्यास स्वउपचार न करता नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.'' - डॉ. शुभांगी अंबाडेकर (नेत्रतज्ज्ञ सिव्हिल रुग्णालय ठाणे)




काय काळजी घ्याल :


बाहेर पडताना डोळ्यांवर थंड वाऱ्याचा आणि धुळीचा थेट परिणाम होतो. त्यामुळे सनग्लासेस किंवा संरक्षणात्मक चष्मा वापरणे आवश्यक आहे. हे डोळ्यांना थंडी, धूळ आणि तीव्र प्रकाशापासून बचाव करत असल्याची माहिती सिव्हिल रुग्णालयाच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली.


गाजर, पालक, बदाम, अक्रोड आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स असलेले पदार्थ डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.


व्हिटॅमिन ए, सी आणि ई यांचा पुरवठा केल्यास दृष्टीसंबंधी त्रास कमी होऊ शकतो.


 प्रत्येक २० मिनिटांनी २० सेकंद स्क्रीनपासून दूर पाहण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्यास डोळ्यांवरील ताण कमी होतो.


Comments
Add Comment

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका