राज्यावर पावसाचं संकट कायम ; हवामान विभागाचा इशारा

मुंबई : एरवी सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडणे थांबते. पण यंदा नोव्हेंबर महिना आला तरी राज्यातच नाही तर देशातही ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे शेतीचं आणि पशुधनाचं नुकसान झालं आहे. राज्यात आणखी किमान तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.


महाराष्ट्रात किमान तीन दिवस हलक्या ते माध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. हा पाऊस पडत असताना ठिकठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. पुणे, सांगली, सातारा येथे ढगाळ वातावरण असेल. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचीही शक्यता असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. मोंथा चक्रीवादळांनंतर आणखी एका वादळाचा फटका बसणार असल्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम असेल; असे हवामान विभागाने सांगितले.


हवामान विभागाचा इशारा


नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच देशातील हवामानात मोठा बदल होत आहे. पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्यामुळे देशाच्या अनेक भागात पाऊस आणि वादळे येऊ शकतात. तसेच ८ नोव्हेंबर पर्यंत उत्तराखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


रत्नागिरी, सांगली, सातारा, अहिल्यानगर, पुणे या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस येईल. बीड, नांदेड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, परभणी, ठाणे, रायगड, जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असेल आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावण्याचे संकेत वर्तवले जात आहेत, यादरम्यान वेगाने वारेही वाहण्याची शक्यता आहे.


८ नोव्हेंबर पर्यंत संकेत आहे


हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सोमवारपासून सक्रिय झालेल्या पश्चिमी विक्षोभाचा उत्तर प्रदेशवर सौम्य परिणाम होऊ शकतो. बहुतेक ठिकाणी पावसाची अपेक्षा नाही. मध्य आणि पश्चिम भारतात हवामान बदल दिसून येत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पूर्व मध्य प्रदेशात वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोवा किनारपट्टी भागात 5 ते 6 नोव्हेंबर दरम्यान वादळ येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,