राज्यावर पावसाचं संकट कायम ; हवामान विभागाचा इशारा

मुंबई : एरवी सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडणे थांबते. पण यंदा नोव्हेंबर महिना आला तरी राज्यातच नाही तर देशातही ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे शेतीचं आणि पशुधनाचं नुकसान झालं आहे. राज्यात आणखी किमान तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.


महाराष्ट्रात किमान तीन दिवस हलक्या ते माध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. हा पाऊस पडत असताना ठिकठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. पुणे, सांगली, सातारा येथे ढगाळ वातावरण असेल. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचीही शक्यता असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. मोंथा चक्रीवादळांनंतर आणखी एका वादळाचा फटका बसणार असल्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम असेल; असे हवामान विभागाने सांगितले.


हवामान विभागाचा इशारा


नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच देशातील हवामानात मोठा बदल होत आहे. पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्यामुळे देशाच्या अनेक भागात पाऊस आणि वादळे येऊ शकतात. तसेच ८ नोव्हेंबर पर्यंत उत्तराखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


रत्नागिरी, सांगली, सातारा, अहिल्यानगर, पुणे या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस येईल. बीड, नांदेड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, परभणी, ठाणे, रायगड, जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असेल आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावण्याचे संकेत वर्तवले जात आहेत, यादरम्यान वेगाने वारेही वाहण्याची शक्यता आहे.


८ नोव्हेंबर पर्यंत संकेत आहे


हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सोमवारपासून सक्रिय झालेल्या पश्चिमी विक्षोभाचा उत्तर प्रदेशवर सौम्य परिणाम होऊ शकतो. बहुतेक ठिकाणी पावसाची अपेक्षा नाही. मध्य आणि पश्चिम भारतात हवामान बदल दिसून येत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पूर्व मध्य प्रदेशात वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोवा किनारपट्टी भागात 5 ते 6 नोव्हेंबर दरम्यान वादळ येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०