बिहारमध्ये बेगुसरायमध्ये सर्वांधिक मतदान; लखीसरायमध्ये आरजेडीच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ

सिमरी : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बेगुसरायमध्ये सर्वाधिक ६७.३२% मतदान झाले, तर शेखपुरा येथे सर्वात कमी ५२.३६% मतदान झाले. राजधानी पाटणा येथे ५५.०२% मतदान झाले.


५६ अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरू राहिले. बिहारमधील शहरी मतदारांमध्ये उत्साहाचा अभाव होता. १२१ जागांपैकी तीन जागांवर सर्वात कमी मतदान झाले. राजधानी पाटणामधील शहरी भागात कुम्हरार येथे ३९.५२%, दिघा येथे ३९.१०% आणि बांकीपूर येथे ४०% मतदान झाले. मतदानाच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर, १८ जिल्ह्यांमधील १२१ जागांवर १,३१४ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील करण्यात आले. बिहारमधील २४३ जागांसाठी दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील.


मुजफ्फरपूरमधील गायघाट विधानसभा मतदारसंघातील तीन बूथवर मतदान बहिष्कार टाकण्यात आला. बूथ क्रमांक १६१, १६२ आणि १७० वरील मतदारांनी ओव्हर ब्रिज आणि रस्ता बांधकामासाठी मतदान बहिष्कार टाकला. पहिल्या टप्प्यात दोन उपमुख्यमंत्र्यांसह १८ मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पहिल्या टप्प्यात १० हॉट सीट्स असून ज्यामध्ये तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव, सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा, अनंत सिंग यांच्यासह अनेक मोठ्या चेहऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सिमरी बख्तियारपूर, महिसी, तारापूर (मुंगेर जिल्हा) आणि जमालपूर येथे मतदानाची वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे.



उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनांवर दगडफेक, शेणफेक


बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात लखीसरायमध्ये मोठा राडा झाला. राजदच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्या कारला घेराव घालत त्यांच्या वाहनावर दगडफेक आणि शेणफेक केली. आरजेडी कार्यकर्त्यांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी लखीसराय एपीसींना फोन केला. त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर टीका केली. लखीसरायच्या बूथ नंबर ४०४ आणि ४०५ कडे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. आरजेडीचे कार्यकर्ता मतदान प्रक्रियेत अडथळे आणत आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्र्यांनी केलाय. लखीसरायमध्ये एक बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. तसेच त्यांच्या ताफ्यामधील वाहनांवर शेण फेकण्यात आले. यातून राजद पक्षाची मानसिकता कशी आहे, याचे हे दर्शन आहे, असं उपमुख्यमंत्री विजय सिन्हा म्हणाले. या घटनेचे व्हिडिओही समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये विजय सिन्हा माध्यमांशी बोलत असताना काही लोकांनी सिन्हा यांच्या ताफ्याला अडवले. घोषणाबाजी करत आणि तेथे राडा घातला. आणखी एका व्हिडिओमध्ये काही लोक विजय सिन्हा यांच्या ताफ्यावर शेण फेकत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर काहींनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केली.

Comments
Add Comment

Sheikh Hasina : बांगलादेशमधील हालचालींना वेग? RAW प्रमुखांनी घेतली पंतप्रधान तारिक यांच्या संरक्षण सल्लागारांशी भेट; शेख हसीनांच्या परतीचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली : बांग्लादेशातील राजकीय घडामोडींना आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. भारताची गुप्तचर संस्था रिसर्च

YouTube च्या नियमात मोठे बदल! आता नवीन क्रिएटर्ससाठी कमाईचा मार्ग होणार आणखी कठीण

नवी दिल्ली : युट्यूब (YouTube) वरून कमाई करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे.

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,