सिग्नल ओव्हरशूट! छत्तीसगडमध्ये झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघाताचे कारण आले समोर

छत्तीसगड: छत्तीसगडमधील बिलासपूर येथे काल (४ नोव्हेंबर) सायंकाळी मेमू ट्रेनचा आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा मोठा होता की, मेमू ट्रेनचा एक डब्बा मालगाडीवर चढला. ज्यात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी आहेत. या अपघाताची कारणे शोधण्यासाठी रेल्वेकडून तपास करण्यात आला आहे.


छत्तीसगडमध्ये झालेल्या अपघाताबद्दल तपास करताना मेमू ट्रेनने सिग्नल तोडल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. रेल्वेच्या ऑपरेशन विभागाच्या मते, जेव्हा ट्रेन बिलासपूर स्टेशनजवळ आली तेव्हा एक मालगाडी आधीच विरुद्ध मार्गावर उभी होती. मेमू ट्रेन चालकाने सिग्नलवर गाडी न थांबवता थेट पुढे आणली. यामुळे हा अपघात झाल्याचे मानले जात आहे.



दरम्यान सिग्नल ओव्हरशूट तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी चुकीमुळे याचा तपास सुरू आहे. रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मेमू गाड्यांमध्ये आधुनिक सिग्नलिंग आणि ब्रेकिंग सिस्टीम आहेत, त्यामुळे अशा चुका दुर्मिळ होतात. अपघाताच्या वेळी ट्रेनचा वेग आणि ब्रेकिंग सिस्टीम योग्यरित्या काम करत होती की नाही याची चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली