सिग्नल ओव्हरशूट! छत्तीसगडमध्ये झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघाताचे कारण आले समोर

छत्तीसगड: छत्तीसगडमधील बिलासपूर येथे काल (४ नोव्हेंबर) सायंकाळी मेमू ट्रेनचा आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा मोठा होता की, मेमू ट्रेनचा एक डब्बा मालगाडीवर चढला. ज्यात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी आहेत. या अपघाताची कारणे शोधण्यासाठी रेल्वेकडून तपास करण्यात आला आहे.


छत्तीसगडमध्ये झालेल्या अपघाताबद्दल तपास करताना मेमू ट्रेनने सिग्नल तोडल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. रेल्वेच्या ऑपरेशन विभागाच्या मते, जेव्हा ट्रेन बिलासपूर स्टेशनजवळ आली तेव्हा एक मालगाडी आधीच विरुद्ध मार्गावर उभी होती. मेमू ट्रेन चालकाने सिग्नलवर गाडी न थांबवता थेट पुढे आणली. यामुळे हा अपघात झाल्याचे मानले जात आहे.



दरम्यान सिग्नल ओव्हरशूट तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी चुकीमुळे याचा तपास सुरू आहे. रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मेमू गाड्यांमध्ये आधुनिक सिग्नलिंग आणि ब्रेकिंग सिस्टीम आहेत, त्यामुळे अशा चुका दुर्मिळ होतात. अपघाताच्या वेळी ट्रेनचा वेग आणि ब्रेकिंग सिस्टीम योग्यरित्या काम करत होती की नाही याची चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने