सिग्नल ओव्हरशूट! छत्तीसगडमध्ये झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघाताचे कारण आले समोर

छत्तीसगड: छत्तीसगडमधील बिलासपूर येथे काल (४ नोव्हेंबर) सायंकाळी मेमू ट्रेनचा आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा मोठा होता की, मेमू ट्रेनचा एक डब्बा मालगाडीवर चढला. ज्यात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी आहेत. या अपघाताची कारणे शोधण्यासाठी रेल्वेकडून तपास करण्यात आला आहे.


छत्तीसगडमध्ये झालेल्या अपघाताबद्दल तपास करताना मेमू ट्रेनने सिग्नल तोडल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. रेल्वेच्या ऑपरेशन विभागाच्या मते, जेव्हा ट्रेन बिलासपूर स्टेशनजवळ आली तेव्हा एक मालगाडी आधीच विरुद्ध मार्गावर उभी होती. मेमू ट्रेन चालकाने सिग्नलवर गाडी न थांबवता थेट पुढे आणली. यामुळे हा अपघात झाल्याचे मानले जात आहे.



दरम्यान सिग्नल ओव्हरशूट तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी चुकीमुळे याचा तपास सुरू आहे. रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मेमू गाड्यांमध्ये आधुनिक सिग्नलिंग आणि ब्रेकिंग सिस्टीम आहेत, त्यामुळे अशा चुका दुर्मिळ होतात. अपघाताच्या वेळी ट्रेनचा वेग आणि ब्रेकिंग सिस्टीम योग्यरित्या काम करत होती की नाही याची चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

अखेर तो ऐतिहासिक क्षण आलाच... मंदिर शिखरावर धर्म ध्वज फडकला अन् हिंदुचे स्वप्न साकार!

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिरात आज ध्वजारोहण समारंभ पार पडला. अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर अखेर भगवा फडकला

रामजन्मभूमीमध्ये मोदींचे आगमन, ध्वजारोहणाची लगबग सुरू

अयोध्या: अनेक वर्षांचे हिंदूंचे स्वप्न आज साकार होणार आहे. अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून आज

Ram Mandir Flag Hoisting Ceremony : १९१ फूट उंची आणि २२ फूट लांबीचा विक्रमी ध्वज, आज अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण

अयोध्या : तब्बल ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येत साकारलेल्या भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या

राममंदिरावर फडकवण्यात येणाऱ्या ध्वजाची रचना, महत्त्व आणि इतर तपशील, जाणून घ्या सविस्तर

अयोध्या : हिंदूंचे धार्मिक स्थळ असलेल्या राम मंदिरावर आज ध्वजारोहण समारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत पोहोचले

ध्वजारोहण समारंभाच्या तयारीचा घेतला आढावा अयोध्या  : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काल श्री राम जन्मभूमी मंदिरात

आजच्या सुनावणीवर ‘स्थानिक’ निवडणुकांचे भवितव्य

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणाची मर्यादा आणि ओबीसी