सिग्नल ओव्हरशूट! छत्तीसगडमध्ये झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघाताचे कारण आले समोर

छत्तीसगड: छत्तीसगडमधील बिलासपूर येथे काल (४ नोव्हेंबर) सायंकाळी मेमू ट्रेनचा आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा मोठा होता की, मेमू ट्रेनचा एक डब्बा मालगाडीवर चढला. ज्यात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी आहेत. या अपघाताची कारणे शोधण्यासाठी रेल्वेकडून तपास करण्यात आला आहे.


छत्तीसगडमध्ये झालेल्या अपघाताबद्दल तपास करताना मेमू ट्रेनने सिग्नल तोडल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. रेल्वेच्या ऑपरेशन विभागाच्या मते, जेव्हा ट्रेन बिलासपूर स्टेशनजवळ आली तेव्हा एक मालगाडी आधीच विरुद्ध मार्गावर उभी होती. मेमू ट्रेन चालकाने सिग्नलवर गाडी न थांबवता थेट पुढे आणली. यामुळे हा अपघात झाल्याचे मानले जात आहे.



दरम्यान सिग्नल ओव्हरशूट तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी चुकीमुळे याचा तपास सुरू आहे. रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मेमू गाड्यांमध्ये आधुनिक सिग्नलिंग आणि ब्रेकिंग सिस्टीम आहेत, त्यामुळे अशा चुका दुर्मिळ होतात. अपघाताच्या वेळी ट्रेनचा वेग आणि ब्रेकिंग सिस्टीम योग्यरित्या काम करत होती की नाही याची चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे