हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर?

भिगवण : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या येत आहेत. तशी चर्चा भोर तालुक्यात जोर धरत आहे. अलीकडेच तालुक्यातील नेते यशवंत माने आणि प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, भिगवण–शेटफळगढे जिल्हा परिषद गटात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय हालचालींना वेग आला असल्याची चर्चा आहे. स्थानिक स्तरावर अनेक सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच मातब्बर नेते हे अपक्ष स्वरूपात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे.


या चर्चेनंतर भरणे गटात जाण्याच्या तयारीत असणाऱ्या काही स्थानिक नेत्यांनी 'वेट अँड वॉच ' असा पवित्रा घेतला आहे. ते मंत्री पाटील काय निर्णय घेतात यावर लक्ष ठेऊन आहेत. मंत्री पाटील यांचा प्रभाव इंदापूर तालुक्यात आजही आहे. त्यांच्या कोणत्याही निर्णयाचा परिणाम ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


राजकीय विश्लेषकांच्या मते, हर्षवर्धन पाटील यांच्या संभाव्य निर्णयाने इंदापूरच्या सत्तासमीकरणात मोठा बदल घडू शकतो. त्यांच्या अनुभव आणि संघटन कौशल्यामुळे भाजपला बळकटी मिळेल, राष्ट्रवादीत अस्वस्थता वाढेल, अशी चर्चा तालुक्यात रंगत आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार