फडणवीसांनी युतीचा पेच सोडवला! जागा वाटपावर मतभेद असले तरी 'पोस्ट पोल युती' निश्चित

फडणवीसांनी कोल्हापुरात सोडले उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र!


कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होताच, महायुतीमधील तीन घटक पक्ष (भाजप, शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी) एकत्र लढणार की नाही, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधत याबद्दलची अंतिम भूमिका स्पष्ट केली.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंबंधी तिन्ही पक्ष आपापल्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील. पण, कुठल्याही परिस्थितीत आम्ही तिघे एकत्रच आहोत. कुठे युती झाली नाही तरी, 'पोस्ट पोल' (निवडणुकीनंतर) युती होईल," असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.


म्हणजेच, काही ठिकाणी जागावाटपात एकमत न झाल्यास तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले तरी, निवडणुकीच्या निकालानंतर ते एकत्र येतील, हे त्यांनी निश्चित केले. महाराष्ट्रातील जनता महायुतीलाच कौल देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आज कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकाच मंचावर उपस्थित होते.



ठाकरेंवर जोरदार टीका


दरम्यान, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार आणि खरवडून गेलेल्या जमिनीसाठी एकरी साडेतीन लाख रुपये मदत देण्याची उद्धव ठाकरेंची मागणी आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, "उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडले ही चांगली गोष्ट आहे. त्यांना टोमणे मारण्याशिवाय काहीही जमत नाही. त्यांनी विकासावर केलेले एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा, असे मी आधीच म्हटलेलो आहे."

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी