Rahul Gandhi : "मतदान वेळी आक्षेप घेतला नाही आणि आता २५ लाख बोगस मतदारांचा आरोप!" राहुल गांधींच्या आरोपांवर आयोगाचं थेट आव्हान!

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्राप्रमाणेच (Maharashtra) हरियाणा विधानसभा निवडणुकीतही (Haryana Assembly Election) मोठा घोळ झाला असून, निवडणूक 'चोरण्यात' आल्याचा गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी हरियाणात २५ लाख बोगस मतदान (Fake Voting) झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, ब्राझीलच्या मॉडेलच्या नावाने हरियाणात २२ वेळा मतदान करण्यात आले, तर एकाच महिलेच्या नावाने २२३ वेळा मतदान झाल्याचाही आरोप राहुल गांधींनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, हरियाणात प्रत्येक ८ मतदारांमागे एक बोगस मतदार असल्याचाही दावा त्यांनी केला. यामुळे काँग्रेसचा विजय पराभवात बदलण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राहुल गांधींनी केलेल्या या खळबळजनक आरोपांवर निवडणूक आयोगाने (Election Commission) सडेतोड उत्तर दिले आहे, आयोगाने स्पष्ट केले की, काँग्रेसकडून यासंबंधी एकही अधिकृत तक्रार आली नाही. तसेच, मतदान होत असताना काँग्रेसच्या पोलिंग एजंट्सनी आक्षेप का घेतला नाही, असा प्रतिप्रश्न (Counter Question) आयोगाने केला. निवडणूक आयोगाने राहुल गांधींना सल्ला दिला आहे की, त्यांना काही प्रश्न किंवा पुरावे द्यायचे असल्यास त्यांनी निवडणूक आयोगामध्ये रितसर तक्रार करावी. तसेच, यासंबंधी त्यांना उच्च न्यायालयाचे दरवाजेही खुले आहेत आणि ते कोर्टातही जाऊ शकतात, असे आयोगाने म्हटले आहे. राहुल गांधींच्या आरोपांमुळे सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.



निवडणूक आयोगाकडून काँग्रेसच्या 'पोलिंग एजंट्स'च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


हरियाणा विधानसभा निवडणुकीत २५ लाख बोगस मतदान झाल्याचा खळबळजनक आरोप करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना निवडणूक आयोगाने आता काँग्रेसवरच सवाल उपस्थित करत घेरले आहे. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर आयोगाने काँग्रेसला विचारले की, "काँग्रेसचे मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रांवर काय करत होते?" आयोगाने नियमांची आठवण करून देत स्पष्ट केले की, जर कोणत्याही मतदाराने आधीच मतदान केलं असेल किंवा मतदान प्रतिनिधीला त्या मतदाराच्या ओळखीवर शंका आली असेल, तर त्यांनी ताबडतोब हरकत नोंदवायला हवी होती. ही हरकत नोंदवण्याची जबाबदारी त्यांच्या पोलिंग एजंट्सची होती. मतदान प्रक्रियेदरम्यान काँग्रेसच्या पोलिंग एजंट्सनी कोणतीही तक्रार न केल्यामुळे, आता आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांची विश्वासार्हता तपासण्यास सुरुवात केली आहे.



बनावट मतदार भाजपचेच कसे? निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना तिसरा सवाल


आयोगाने या बनावट मतदारांच्या राजकीय निष्ठेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणूक आयोगाने थेट प्रश्न केला आहे की, "जरी हे मतदार बनावट असले तरी, त्यांनी भाजपलाच मतदान केलं असं कसं म्हणता येईल?" हा मुद्दा आयोगाने राहुल गांधींच्या आरोपातील तार्किक त्रुटीवर बोट ठेवणारा आहे. आयोगाने मतदार यादी दुरुस्तीच्या प्रक्रियेवर लक्ष वेधले. आयोगाने विचारले की, "मतदार यादीतील दुरुस्तीदरम्यान काँग्रेसचे बीएलए यांनी एकाही नावाबद्दल दावा किंवा हरकत का घेतली नाही?" याचा अर्थ असा की, मतदानापूर्वी काँग्रेसने मतदार यादीतील संभाव्य त्रुटी किंवा बनावट नावांकडे लक्ष दिले नाही, याकडे आयोगाने लक्ष वेधले आहे. यामुळे, राहुल गांधींना आता त्यांचे आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे सादर करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.



काँग्रेसकडून 'एकही अपील' नाही; आयोगाने उपस्थित केला कायदेशीर प्रश्न


हरियाणा निवडणुकीत मोठा घोळ झाल्याचा आरोप करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पक्षाने या विरोधात कायदेशीर पाऊल का उचलले नाही, असा प्रश्न आता निवडणूक आयोगाने उपस्थित केला आहे. आयोगाने माहिती दिली की, हरियाणातील एकूण ९० मतदारसंघातील निवडणुकीच्या विरोधात सध्या उच्च न्यायालयात फक्त २२ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. आयोगाने स्पष्ट केले की, नियमांनुसार, जर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला वाटत असेल की मतदार यादीत किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेत काही गडबड झाली आहे, तर त्याविरोधात अपील दाखल करता येते. मात्र, आयोगाने स्पष्ट केले आहे की, आतापर्यंत काँग्रेसकडून एकही अपील दाखल करण्यात आलेले नाही. निवडणूक आयोगाच्या या स्पष्टीकरणामुळे, राहुल गांधींना आता त्यांचे २५ लाख बोगस मतदानाचे दावे कोर्टासमोर सिद्ध करण्याची गरज आहे, अन्यथा त्यांचे आरोप पोकळ ठरण्याची शक्यता आहे.



'आरोप असल्यास हायकोर्टात जा!' आयोगाचा सल्ला


निवडणूक आयोगाने आता कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा स्पष्ट सल्ला दिला आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की, नियमांनुसार, जर कोणत्याही उमेदवाराला निवडणुकीच्या निकालांबद्दल आक्षेप असेल, तर तो हायकोर्टाचा दरवाजा ठोठावू शकतो. हरियाणा निवडणुकीच्या प्रकरणात सध्या २२ अपीलं न्यायालयात प्रलंबित आहेत. आयोगाने काँग्रेसला आव्हान दिले आहे की, जर त्यांच्याकडे २५ लाख बोगस मतदानाचे ठोस पुरावे असतील, तर त्यांनी न्यायालयात अपील दाखल करून आपले आरोप सिद्ध करावेत. यामुळे आता राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष कायदेशीर लढाई लढणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या

Mark Zuckerberg Apology : मेटाला PM मोदींचा व्हिडिओ हटवणे भोवले; केंद्र सरकार आक्रमक, झुकरबर्ग यांनी मागितली माफी

NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणी दिल्लीतील जंतरमंतर येथे देशभरातून आंदोलनाचा भडका उडाला होता. या गंभीर पार्श्वभूमीवर

Foreigners Banned In Indian City : इंग्रजांनी वसवलेलं 'हे' निसर्गरम्य शहर; पण आज तिथेच परदेशी पर्यटकांना बंदी का ? कारण काय ?

देवभूमी म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड हे राज्य आपल्या निसर्गरम्य दऱ्या, शांत पर्वत आणि अप्रतिम निसर्ग

Dabur India FSSAI action : डाबर इंडियाला FSSAI चा मोठा दणका! ‘१००% शुद्धतेचे’ दावे करणाऱ्या मध, तुपासह अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

नवी दिल्ली : ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि दाव्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Mark Zuckerberg : पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ काढणं मेटाला महागात पडणार? मार्क झुकरबर्गना संसदीय समितीचा ३ दिवसांचा अल्टिमेटम; “माफी मागा अन्यथा…”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक महत्त्वाचा व्हिडिओ काही तासांसाठी फेसबुकवरून (Facebook)