बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, कर्नाटकमधील बंजारा समाजाला दिलासा


मुंबई : हैद्राबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरात ६० मोर्चे काढण्यात आले होते, त्या आंदोलनांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे यासाठी एक स्वतंत्र आयोग स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रयत्नाने मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी फडणवीस यांनी आयोगाची घोषणा केली. यावेळी राज्यभरातील बंजारा समाजाच्या नेत्यांना बैठकीसाठी बोलवण्यात आले होते.


मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत धर्मगुरू बाबुसिंग महाराज, कॅबिनेट मंत्री संजय राठोड, मंत्री इंद्रनील नाईक, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, आमदार तुषार राठोड, राजेश राठोड, माझी खासदार हरिभाऊ राठोड,निलय नाईक, गोर सेना प्रमुख संदेश चव्हाण, श्रावण चव्हाण, पत्रकार कविराज चव्हाण, उपोषणकर्ते विजय चव्हाण, विनोद आडे यांच्यासह प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बंजारा समाजाचे आम्हाला वेळोवेळी पाठींबा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बंजारा समाजाच्यावतीने हैद्राबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षण मिळावे यासाठी मोर्चे आंदोलने करण्यात येत आहे. त्यांच्या या मागणीचा विचार करत आम्ही एक स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून संबधित विभागाने निवडणूक आयोगाची परवानगी घेत प्रक्रिया सुरू करावी. वसंतराव नाईक महामंडळाला अव्वल दर्जाचा अधिकारी देणार असून बंजारा समाजाच्या आरक्षणात होणारी घुसखोरी थांबविणार असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात राहणाऱ्या कर्नाटकमधील बंजारा समाजाला जातीचे दाखले उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी इतर मागासवर्गीय विभागाला दिले.

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे