जगज्जेत्या टीमचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना आवडतो 'हा' पदार्थ

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ वर भारतानं नाव कोरलं. ही किमया साधण्यासाठी टीम इंडियाला प्रेरित करणे आणि प्रशिक्षण करणे ही अतिशय महत्त्वाची कामं केली त प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी. अंतिम सामन्याच्या दिवशीही फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करा आणि उत्तम खेळ करा. बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा अशा स्वरुपाचं मार्गदर्शन मुझुमदार यांनी टीमला केलं. प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांचा हा गुरुमंत्र टीम इंडियासाठी लाभदायी ठरला. भारताने पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकला.


भारताच्या जगज्जेतेपदात अमोल मुझुमदार यांची महत्त्वाची भूमिका आहे. ही भूमिका चोख बजावल्यानंतर सोमवारी ३ नोव्हेंबरच्या रात्री अमोल मुझुमदार त्यांच्या विलेपार्ले येथील घरी परतले. यावेळी त्यांचे घर ज्या सोसायटीत आहे तिथल्या रहिवाशांनी अमोल मुझुमदार यांचे जोरदार स्वागत केले. भारताला जगज्जेतेपद मिळवून देण्यामागे मुझुमदार यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याकरता त्यांच्या शेजाऱ्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी मुझुमदार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.




माध्यमांसोबत संवाद साधताना अमोल मुझुमदार म्हणाले की, 'हे सारे अविश्वसनीय आहे! या जगज्जेतेपदाची विलक्षण अनुभूती समजायला थोडा वेळ जाईल.' तसेच या जगज्जेतेपदाची तुलना त्यांनी १९८३ च्या वर्ल्ड कप यशासह केली. त्या जेतेपदाने जशी भारतीय तरुणांना क्रिकेटपटू होण्याची प्रेरणा दिली, तशीच स्फूर्ती या विश्वचषकामुळे महिलांमध्ये येईल, असे ते म्हणाले. खेळाडूंविषयी बोलताना ते म्हणाले की, 'मी आणि हरमन खूप चर्चा वगैरे करत नाही. पण स्मृतीसह फलंदाजी, नियोजन याबद्दल खूप संवाद होतो. कामाबद्दल हरमनसोबत समन्वय आहेच. प्रशिक्षक आणि कर्णधाराचे नाते असेच असावे. त्यांच्यात मतभिन्नता नसावी. माझे आणि हरमनचे नेहमीच एकमत असते.'


महत्त्वाचे म्हणजे अमोल मुझुमदार विशेष परवानगी घेऊन घरी आले आहे. त्यांनी या संदर्भात सविस्तर माहिती माध्यमांना दिली. विशेष परवानगी घेऊन घरचे जेवण खाण्यासाठी घरी आल्याचे त्यांनी सांगितले. अनेक दिवस बाहेर असल्यामुळे घरच्या जेवणाची आठवण येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी त्यांच्या पत्नीला जेवणात खास वरण भात आणि फिश फ्राय करायला सांगितल्याचेही ते म्हणाले. घरचा वरण भात आणि फिश फ्राय हे अतिशय आवडीचे पदार्थ असल्याचे टीम इंडियाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार म्हणाले.

Comments
Add Comment

वर्ल्डकप जिंकल्यावर हरमनप्रीतने सोशल मीडियातून दिला 'हा' संदेश

नवी मुंबई : भारतीय महिला संघाने आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला आणि भारतीय क्रिकेटचा नवा अध्याय लिहिला.

कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीनंतर हरमनप्रीत कौरने रचला इतिहास

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा

ICC Worldcup 2025 : भारताच्या लेकींनी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला! वर्ल्ड कप जिंकून देशवासियांना दिला 'हा' सर्वात मोठा संदेश

नवी मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या (DY Patil Sports Academy) रोषणाईत, २ नोव्हेंबर (रविवार) रोजी भारतीय

ICC Women's Cricket World Cup 2025 : जीत लिया जहां... PM मोदींनी केले अभिनंदन, तर 'मास्टर ब्लास्टर' सचिनला आठवली '१९८३' ची गाथा!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) रविवारी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर (Dr. DY Patil Stadium) एक ऐतिहासिक

Rohit Sharma : महिला संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माचे डोळे पाणावले; 'त्या' भावूक क्षणाचा फोटो होतोय व्हायरल!

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) अखेर आपला पहिला वनडे वर्ल्ड कप (First ODI World Cup) जिंकून इतिहास रचला आहे.

भारताच्या मुलींची कमाल, वर्ल्डकप जिंकून केली धमाल; फक्त १० मुद्यात वाचा टीम इंडियाच्या विजयाची गोष्ट

नवी मुंबई : भारताच्या महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ (ICC Women World Cup 2025) जिंकला