भारतातील अस्वच्छ शहरांमध्ये मुंबईचा समावेश, दिल्लीलाही टाकले मागे

मुंबई: स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ च्या अहवालात स्वच्छतेच्या आधारावर भारतातील शहरांचे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. यात मुंबई सर्वात खालच्या क्रमांकावर असून दहा लाखाहून अधिक लोकसंख्येच्या सर्वात अस्वच्छ शहरात मुंबई ३३ व्या स्थानी आली आहे.


सर्वेक्षण यादीत मदुराई सर्वात खालच्या क्रमांकावर म्हणजे ४०व्या स्थानावर आहे. त्यानंतर लुधियाना (३९), चेन्नई (३८), रांची (३७), बंगळुरु (३६),धनबाद (३५) आणि फरीदाबाद (३४) अशा क्रमाने शहरांची यादी जाहीर केली आहे. तर प्रदुषणात अग्रेसर असलेले दिल्ली स्वच्छतेमध्येपण मागेच आहे. कारण सर्वेक्षण यादीत दिल्ली ३१व्या क्रमांकावर आहे.


अहवालानुसार गुजरातचे अहमदाबाद हे शहर स्वच्छतेच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर भोपाळ, लखनऊ, जयपूर, जबलपूर ही शहरे टॉप फाईव्हमध्ये आहेत. तर हैदराबाद, पिंपरी-चिंचवड, पुणे, विशाखापट्टणम, आग्रा सारखी अन्य शहरे देखील स्वच्छतेच्या यादीत अग्रेसर आहेत.


रँकिंग कशी तयार केली ?


स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२०२५ मध्ये रँकींगचे अनेक पॅरामीटर निश्चित केले गेले. त्यात साफसफाई, कचरा व्यवस्थापन, सॅनिटेशन, वापर होणाऱ्या पाण्याचे नियोजन, वैद्यकीय कचऱ्याचे नियोजन यांचा समावेश होता. तसेच मूल्यांकनामध्ये निवासी आणि व्यावसायिक विभाग, सार्वजनिक जागा, शाळा, झोपडपट्ट्या, पाण्याचे स्रोत आणि पर्यटन क्षेत्राचा समावेश केला गेला होता.


Comments
Add Comment

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी

महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया ३ दशलक्ष लिटर पाण्याची होणार विक्री

मुंबई: कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रात प्रकल्पातून पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी प्राप्त होणाऱ्या १० दशलक्ष

मिठी नदीच्या कामाला येत्या १ एप्रिलपासून होणार सुरुवात

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आतापर्यंत कंपन्याच