भारतातील अस्वच्छ शहरांमध्ये मुंबईचा समावेश, दिल्लीलाही टाकले मागे

मुंबई: स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ च्या अहवालात स्वच्छतेच्या आधारावर भारतातील शहरांचे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. यात मुंबई सर्वात खालच्या क्रमांकावर असून दहा लाखाहून अधिक लोकसंख्येच्या सर्वात अस्वच्छ शहरात मुंबई ३३ व्या स्थानी आली आहे.


सर्वेक्षण यादीत मदुराई सर्वात खालच्या क्रमांकावर म्हणजे ४०व्या स्थानावर आहे. त्यानंतर लुधियाना (३९), चेन्नई (३८), रांची (३७), बंगळुरु (३६),धनबाद (३५) आणि फरीदाबाद (३४) अशा क्रमाने शहरांची यादी जाहीर केली आहे. तर प्रदुषणात अग्रेसर असलेले दिल्ली स्वच्छतेमध्येपण मागेच आहे. कारण सर्वेक्षण यादीत दिल्ली ३१व्या क्रमांकावर आहे.


अहवालानुसार गुजरातचे अहमदाबाद हे शहर स्वच्छतेच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर भोपाळ, लखनऊ, जयपूर, जबलपूर ही शहरे टॉप फाईव्हमध्ये आहेत. तर हैदराबाद, पिंपरी-चिंचवड, पुणे, विशाखापट्टणम, आग्रा सारखी अन्य शहरे देखील स्वच्छतेच्या यादीत अग्रेसर आहेत.


रँकिंग कशी तयार केली ?


स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२०२५ मध्ये रँकींगचे अनेक पॅरामीटर निश्चित केले गेले. त्यात साफसफाई, कचरा व्यवस्थापन, सॅनिटेशन, वापर होणाऱ्या पाण्याचे नियोजन, वैद्यकीय कचऱ्याचे नियोजन यांचा समावेश होता. तसेच मूल्यांकनामध्ये निवासी आणि व्यावसायिक विभाग, सार्वजनिक जागा, शाळा, झोपडपट्ट्या, पाण्याचे स्रोत आणि पर्यटन क्षेत्राचा समावेश केला गेला होता.


Comments
Add Comment

स्वतंत्र न राहता दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष येणार एकत्र

गट स्थापन करत आपला नेमणार गटनेता, विविध समित्यांमध्ये मिळवणार स्थान मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत

Dahisar Bhayandar Metro 9 Line Railway : दहिसर-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो-९ ला 'ग्रीन सिग्नल', १० स्थानके, १३ किमी मार्गाचा रुट; फेब्रुवारीत धावणार पहिली ट्रेन

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुन्हा एकदा पुढे,कधी आहेत?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुळीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात

मुख्यमंत्र्यांनी केली तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा; एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या