बिहारमध्ये कमळ फुलणार!

ओपनियन पोलच्या अंदाजानुसार एनडीएचे बिहारमध्ये सरकार


नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. १२१ जागांसाठी या टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्याचा प्रचार आता संपला आहे ज्यानंतर ओपिनियन पोल समोर आले आहेत ज्यात पुन्हा एकदा एनडीए सरकार बिहारमध्ये स्थापन होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच बिहारमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.


आयएनएस मॅटराइज म्हटले आहे की, एनडीएला १५३ ते १५६ जागा मिळू शकतात. विरोधी पक्षांच्या महाआघाडीला ७६ ते ८७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


बिहारमध्ये निवडणुकीचा पहिला टप्पा ६ तारखेला पार पडणार आहे. त्याआधीच ओपनियन पोलचा हा अंदाज समोर आला आहे. जदयूला ६१ ते ६५ जागा मिळतील तर चिराग पासवान यांच्या लोजपाला ४ ते ५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर हिंदुस्थानी अवाम मोर्चाला या निवडणुकीत ४ ते ५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.



महाआघाडीला किती जागा मिळतील?


विरोधकांच्या महाआघाडीबाबत ओपिनियन पोलमध्ये जो अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यानुसार राजदला ६२ ते ६६ जागा मिळतील तर काँग्रेसला ७ ते ९ जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. तर विकसनशील इन्सान पार्टीला १ ते २ जागा मिळतील असा अंदाज आहे. बिहार निवडणुकीच्या प्रचाराचा रणसंग्राम गेल्या महिन्याभरापासून रंगला आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर ओपिनियन पोलचा अंदाज आला आहे.



इतर पक्षांना किती जागांचा अंदाज?


असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाला १ ते २ जागा मिळतील असा अंदाज आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला १ ते ३ जागा मिळतील तर अपक्षांना १ ते ४ जागा मिळतील असा अंदाज आहे. आयएनएस मॅटराइजने ओपिनियन पोल घेताना ७३ हजार २८७ लोकांशी चर्चा केली आहे. यामध्ये ३८ हजार १०९, १९ हजार ७८७ महिला आणि १५ हजार ३९० तरुणांचा समावेश होता. या सर्वेच्या अंदाजानुसार एनडीएला १३३ ते १४३ जागा मिळू शकतात. तर महाआघाडीला ९३ ते १०२ जागा मिळू शकतात.

Comments
Add Comment

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी