दिव्यातील जळालेली वात फेकणे शुभ की अशुभ? जाणून घ्या सविस्तर....

मुंबई : घरात देवपूजा करताना किंवा दिवा लावताना वापरल्या जाणाऱ्या वाती अनेकजण सहजपणे कचऱ्यात फेकून देतात. मात्र, धार्मिक आणि आध्यात्मिक मान्यतेनुसार हे करणं अशुभ मानले जाते. दिवा हे केवळ प्रकाशाचं नाही, तर शुभ, ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. दिव्यातून निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे जळलेल्या वातींचे महत्त्व वाढते, असं वेदांमध्ये सांगितलं आहे.


अध्यात्मिक मान्यतांनुसार, दिवा विझल्यानंतर वातींमध्ये सकारात्मक ऊर्जा जमा झालेली असते. त्यामुळे त्या वाती कचऱ्याच्या डब्यात टाकल्यास, त्यांच्यासोबत घरातील सकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाते, असं मानलं जातं. त्यामुळे, नकळत होणारी ही चूक टाळायला हवी.



वाती योग्यरित्या कशा हाताळाव्यात?


वाती काळजीपूर्वक गोळा करून एका वेगळ्या बॉक्समध्ये ठेवाव्यात. गोळा केलेल्या वाती पौर्णिमा, अमावस्या, पूर्व काळ, अष्टमी किंवा नवमी यांसारख्या विशिष्ट दिवशी एका ठिकाणी ठेवा. त्यावर थोडा कापूर ठेवा. शक्य असल्यास, वातींवर तुपाचे दोन थेंब ओता. हे मिश्रण पुन्हा प्रज्वलित करा. या प्रक्रियेतून जी विभूती तयार होते, ती अत्यंत सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण मानली जाते.



विभूतीचे फायदे काय?


ही शुभ विभूती अनेक चांगल्या कार्यांसाठी वापरली जाऊ शकते. ज्यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते.


तुम्ही कपाळावर टिळा म्हणून लावल्यास, मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते.


कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी किंवा शुभ कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ही विभूती लावल्यास ते शुभफळ देते.


ही विभूती घराच्या मुख्य दाराजवळ ठेवल्यास घराची कीर्ती, वैभव आणि प्रतिष्ठा वाढते.


घरात असलेली काळी जादू किंवा नकारात्मक शक्ती या विभूतीच्या वापराने दूर होतात, असे मानले जाते.


ही विभूती घरमालकाचे आरोग्य आणि दीर्घायुष्य सुधारण्यास मदत करते, अशी श्रद्धा आहे.


त्यामुळे दिव्याच्या वाती केवळ कचरा नसून, त्या सकारात्मक ऊर्जेचं भांडार आहेत. त्यांना योग्य मान देऊन विधी केल्यास, घरातील सुख-समृद्धी कायम राहते.

Comments
Add Comment

आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक सहाय्यता संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे

मुंबई  : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार २०२६ या वर्षासाठी आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

येत्या ३ आणि ४ डिसेंबरला अर्ध्या मुंबईत १५ टक्के पाणीकपात

मुंबई : भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याने

उत्तन-विरार सी लिंकला हिरवा कंदील

५८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या आराखड्यास मान्यता मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या

माझा पाठिंबा भाजपच्या उमेदवारांनाच खासदार नारायण राणे यांची स्पष्टोक्ती

भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह १७ उमेदवारांनी घेतले खासदार राणे यांचे

ट्रायची स्पॅम कॉलवर कारवाई करण्यास सुरुवात

मुंबई : अनेक दिवसांपासून मोबाईल युजर्स हे स्पॅम कॉलबाबत तक्रारी करत होते. अनेकांना अनोळखी नंबरवरून कॉल यायचे आणि