वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, मिळेल श्रीविष्णूचा आशीर्वाद

मुंबई : कार्तिकी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी साजरी होणारी वैकुंठ चतुर्दशी यंदा ४ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. शिवपुराणानुसार भगवान विष्णूंनी भगवान शंकरांना हजार कमळे अर्पण केली होती, त्यानंतर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना सुदर्शन चक्र बहाल केले. म्हणूनच हा दिवस विष्णू आणि शिव या दोन्ही देवतांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी केलेले काही उपाय जीवनात सुख, शांती आणि प्रगती आणतात असे सांगतात.



सकाळी लवकर स्नान आणि पूजन करा


या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. नंतर गंगाजल मिसळलेल्या पाण्याने भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचा अभिषेक करा आणि विधिवत पूजा करा. विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण केल्यास विशेष शुभ फळ लाभते.



देवघरात तुपाचा दिवा लावा


वैकुंठ चतुर्दशीला घरातील देवघरात तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असल्यास भगवान विष्णूंना हजार कमळांची फुले अर्पण करा. या दिवशी ‘ॐ नमः शिवाय’ आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हे मंत्र किमान हजार वेळा जपल्यास दोन्ही देवतांचे कृपाशिर्वाद मिळतात.



बेल आणि तुळशी अर्पण करण्याची परंपरा


या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा एकमेव दिवस आहे जेव्हा भगवान विष्णूंना बेलाची पाने आणि भगवान शिवांना तुळशीची पाने अर्पण केली जातात. त्यामुळे तुम्हीही या दिवशी भगवान विष्णूंना बेलाची आणि भगवान महादेवांना तुळशीची पाने अर्पण करावीत. असे केल्याने प्रगतीचे मार्ग खुलतात असे सांगतात.



उपवास आणि दीपदानाचे महत्व


वैकुंठ चतुर्दशीला उपवास केल्याने पुण्य प्राप्त होते. संध्याकाळी नदीकाठी किंवा तलावाजवळ १४ दिवे लावल्यास भगवान विष्णू आणि महादेव दोघांचेही आशीर्वाद लाभतात. या विशेष दिवशी केलेली ही उपासना जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी घेऊन येते.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

पिंट्या’ फेम रोहन गुजर होणार बाबा; आठ वर्षांनंतर आयुष्यातआला आनंद

मुंबई : 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला पिंट्या म्हणजेच अभिनेता रोहन गुजर लवकरच बाबा

Budget Session : डहाणूतील 'त्या' प्रकरणावर विधानपरिषदेत पडसाद; दोषी डॉक्टरांचे निलंबन

- आरोग्य केंद्रात बायोमेट्रिक सक्तीचे होणार! मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आशागड प्राथमिक आरोग्य

ब्राझीलमध्ये पावसाचा कहर; आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

ब्राझीलमध्ये निसर्गाचा भीषण कहर पाहायला मिळत आहे. दक्षिण-पूर्व ब्राझीलमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि

'फुला'तून उलगडणार मुरळीची संघर्षमय कथा

मुंबई : अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षमय कथा आगामी 'फुला' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पहायला

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे