भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर

मुंबई  : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत हे जेतेपद पटकावले. या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सत्कार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, ज्यामध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी भारतीय महिला संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं आणि संघाचं अभिनंदन करणारा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.


तसेच, संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना राज्य सरकारतर्फे रोख पारितोषिक देण्याचेही ठरवले असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली. भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये महाराष्ट्राच्या तीन खेळाडू आहेत. यात महाराष्ट्रातील सांगलीची कन्या भारताची उपकर्णधार स्मृती मानधना आहे. तिच्याशिवाय भारताच्या सेमीफायनल विजयाची शिल्पकार जेमिमा रॉड्रीग्ज व फिरकीपटू राधा यादव आहेत. या तिन्ही खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात येणार रोख रक्कम पारितोषिक देण्यात येईल. याशिवाय संपूर्ण भारतीय संघाचा सत्कार करण्यात येणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

Comments
Add Comment

FIFA World Cup Final 2026 : फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आता थेट पहाटे ४ पर्यंत हॉटेलमधून लुटता येणार मॅचचा आनंद

मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना महाराष्ट्रातील फुटबॉल

Coastal Road Accident : मुंबई कोस्टल रोडवर भरधाव पोर्शेचा भीषण अपघात; एअरबॅगमुळे वाचले दोघांचे प्राण

मुंबई(Mumbai) : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास एका आलिशान पोर्शे कारचा भीषण अपघात

Maharashtra Weather : आनंदाची बातमी! महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, कोकणात ४८ तासांत पाऊस पडणार

मुंबई : मागील दीड महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. आता राज्यात पुन्हा एकदा

Malad Sewage Treatment Plant : मालाड मलजल प्रक्रिया केंद्राला खारफुटीसह इतर परवानगी प्राप्त; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी):  मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाने ४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मालाड मलजल

Juhu Chowpatty : जुहू समुद्रकिना-याची स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नेमणूक

मागील एक महिन्यांपासून जेसीबी, डंपरचे कंत्राट आले होते संपुष्टात मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मागील पावसाळ्यात

Mumbai's water stock : मुंबईचा पाणी साठा ५० टक्के पार; सर्व धरणांमध्ये सध्या ५०.७७ टक्के पाणीसाठा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील पाण्याचा साठा जा मागील काही दिवसांपासून ५०