तृतीयपंथी समाज पुन्हा एकदा राजकारणात नवा अध्याय लिहिणार!

निवडणुकीत तृतीयपंथीयांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे - मैत्री संघटना, तृतीयपंथीयांची मागणी


कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये तृतीयपंथी घटकांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे, अशी ठाम मागणी मैत्री संघटना, सर्व तृतीयपंथी समुदाय कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली.


मैत्री संघटनेच्या अध्यक्षा मयुरी आळवेकर, शिवानी गजबर, अमृत आळवेकर, तसेच तृतीयपंथी समाजाचे ज्येष्ठ गुरू शिवाजीराव आळवेकर यांनी यावेळी सांगितले की, राजकीय पक्षांनी तृतीयपंथी समाजातील उमेदवारांना प्राधान्य देऊन उमेदवारी द्यावी, अन्यथा तृतीयपंथी समाज स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यास सक्षम आहे. या समाजामध्ये केवळ प्रतिनिधित्वाची पात्रता नाही, तर जनतेशी जोडून राहण्याची व त्यांच्या प्रश्नांवर उपाय शोधण्याची खरी राजकीय क्षमता आहे, हे या प्रसंगी स्पष्ट करण्यात आले.


तृतीयपंथी समुदायाने या वर्षीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेऊन निवडून येण्याचा निर्धार व्यक्त केला. "महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा राज्य असून शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेला कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच वंचित घटकांच्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यामुळे या समाजालाही समान प्रतिनिधित्व देऊन, राजकीय प्रक्रियेत सामील करून घेणे ही काळाची गरज आहे," असे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.


इतिहासाची नोंद घेत, सन १९६५ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध देवदासी व तृतीयपंथी समाजातील बाळू चौगुले यांनी निवडणूक लढवली होती, अशी माहिती यावेळी देण्यात आली. तब्बल अनेक दशकांनंतर पुन्हा एकदा तृतीयपंथी समाज राजकारणात नवा अध्याय लिहिण्याच्या तयारीत असून, कोल्हापूरकरांनी या समाजाला पाठिबा देऊन सामाजिक न्यायाचा वारसा पुढे न्यावा, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले. या पत्रकार परिषदेला समाजातील विविध प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Nagpur BRICS Summit 2026 : नागपूरमध्ये ११ जुलैपासून ब्रिक्स परिवहन मंत्र्यांची तिसरी बैठक

- जागतिक परिवहन सहकार्य, शाश्वत विकास आणि नव्या तंत्रज्ञानावर होणार मंथन नागपूर : भारताच्या ब्रिक्स २०२६

Maharashtra Rain : नाशिक, पुणे, जळगाव, सांगलीला पावसाने झोडपले, अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली

मुंबई : गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाशिकचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरात अनेक

Pune Building Collapsed : मुसळधार पावसात भीषण दुर्घटना! पिंपरी-चिंचवडमध्ये वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाची इमारत कोसळली; १४ जण अडकल्याची भीती

पुणे : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले असतानाच पुणे जिल्ह्यात मोठी

Andheri Tree Fall : मुंबईत आणखी एक दुर्घटना! अंधेरीत फांदी कोसळून पादचारी गंभीर जखमी

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये आणखी एक भर पडली आहे. अंधेरी पूर्व

Chandrashekhar Bawankule : राज्यातील २ लाख आदिवासींना मिळणार 'सातबारा'

- वनपट्टाधारकांसाठी 'नमुना ७ ई आणि १२ ई' लागू; महसूलमंत्र्यांची विधानसभेत ऐतिहासिक घोषणा मुंबई : राज्यातील लाखो

Vasai-Virar Rain Update : वसई-विरारमध्ये पावसाचा कहर! पूर, वीज आणि इंटरनेट बंद; हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

पालघर : वसई-विरार (Vasai- Virar) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन