तृतीयपंथी समाज पुन्हा एकदा राजकारणात नवा अध्याय लिहिणार!

निवडणुकीत तृतीयपंथीयांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे - मैत्री संघटना, तृतीयपंथीयांची मागणी


कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये तृतीयपंथी घटकांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे, अशी ठाम मागणी मैत्री संघटना, सर्व तृतीयपंथी समुदाय कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली.


मैत्री संघटनेच्या अध्यक्षा मयुरी आळवेकर, शिवानी गजबर, अमृत आळवेकर, तसेच तृतीयपंथी समाजाचे ज्येष्ठ गुरू शिवाजीराव आळवेकर यांनी यावेळी सांगितले की, राजकीय पक्षांनी तृतीयपंथी समाजातील उमेदवारांना प्राधान्य देऊन उमेदवारी द्यावी, अन्यथा तृतीयपंथी समाज स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यास सक्षम आहे. या समाजामध्ये केवळ प्रतिनिधित्वाची पात्रता नाही, तर जनतेशी जोडून राहण्याची व त्यांच्या प्रश्नांवर उपाय शोधण्याची खरी राजकीय क्षमता आहे, हे या प्रसंगी स्पष्ट करण्यात आले.


तृतीयपंथी समुदायाने या वर्षीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेऊन निवडून येण्याचा निर्धार व्यक्त केला. "महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा राज्य असून शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेला कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच वंचित घटकांच्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यामुळे या समाजालाही समान प्रतिनिधित्व देऊन, राजकीय प्रक्रियेत सामील करून घेणे ही काळाची गरज आहे," असे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.


इतिहासाची नोंद घेत, सन १९६५ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध देवदासी व तृतीयपंथी समाजातील बाळू चौगुले यांनी निवडणूक लढवली होती, अशी माहिती यावेळी देण्यात आली. तब्बल अनेक दशकांनंतर पुन्हा एकदा तृतीयपंथी समाज राजकारणात नवा अध्याय लिहिण्याच्या तयारीत असून, कोल्हापूरकरांनी या समाजाला पाठिबा देऊन सामाजिक न्यायाचा वारसा पुढे न्यावा, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले. या पत्रकार परिषदेला समाजातील विविध प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments
Add Comment

धाराशिवमध्ये हिट अँड रन, ऊसतोड मजुरांना उडवले

धाराशिव : धाराशिवमधील कळंब लातूर रस्त्यावर हिट हिट अँड रनची घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या कारने ऊसतोड

Devendra Fadanvis : पाच वर्षांनंतरही राज्यात महायुतीच दिसणार; मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास

गोंदिया : राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध राजकीय चर्चा आणि अफवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

लोणावळ्यात महिलेचा फळविक्रेती ते नगरसेविकापर्यंतचा प्रवास

लोणावळा : लोणावळ्यातील फळविक्रेती भाग्यश्री जगताप यांच्यावर मतदारांनी मोठा विश्वास दाखवत त्यांना नगरसेविका

मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

मुंबई : नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वर मलकापूरजवळ भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या

मराठवाड्यात मविआला मोठा धक्का; परभणी-धाराशिवमध्ये महायुतीचा डंका

धाराशिव : राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मराठवाड्यातील परभणी आणि धाराशिव या दोन

Maharashtra Local Body Elections : "विरोधकांचे 'नरेटिव्ह' भुईसपाट..."; भाजपच्या ऐतिहासिक यशावर मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर सणसणीत टोलेबाजी!

नागपूर : राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीच्या निकालांनी महाराष्ट्राचे राजकीय चित्र पुन्हा एकदा