तृतीयपंथी समाज पुन्हा एकदा राजकारणात नवा अध्याय लिहिणार!

निवडणुकीत तृतीयपंथीयांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे - मैत्री संघटना, तृतीयपंथीयांची मागणी


कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये तृतीयपंथी घटकांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे, अशी ठाम मागणी मैत्री संघटना, सर्व तृतीयपंथी समुदाय कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली.


मैत्री संघटनेच्या अध्यक्षा मयुरी आळवेकर, शिवानी गजबर, अमृत आळवेकर, तसेच तृतीयपंथी समाजाचे ज्येष्ठ गुरू शिवाजीराव आळवेकर यांनी यावेळी सांगितले की, राजकीय पक्षांनी तृतीयपंथी समाजातील उमेदवारांना प्राधान्य देऊन उमेदवारी द्यावी, अन्यथा तृतीयपंथी समाज स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यास सक्षम आहे. या समाजामध्ये केवळ प्रतिनिधित्वाची पात्रता नाही, तर जनतेशी जोडून राहण्याची व त्यांच्या प्रश्नांवर उपाय शोधण्याची खरी राजकीय क्षमता आहे, हे या प्रसंगी स्पष्ट करण्यात आले.


तृतीयपंथी समुदायाने या वर्षीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेऊन निवडून येण्याचा निर्धार व्यक्त केला. "महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा राज्य असून शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेला कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच वंचित घटकांच्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यामुळे या समाजालाही समान प्रतिनिधित्व देऊन, राजकीय प्रक्रियेत सामील करून घेणे ही काळाची गरज आहे," असे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.


इतिहासाची नोंद घेत, सन १९६५ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध देवदासी व तृतीयपंथी समाजातील बाळू चौगुले यांनी निवडणूक लढवली होती, अशी माहिती यावेळी देण्यात आली. तब्बल अनेक दशकांनंतर पुन्हा एकदा तृतीयपंथी समाज राजकारणात नवा अध्याय लिहिण्याच्या तयारीत असून, कोल्हापूरकरांनी या समाजाला पाठिबा देऊन सामाजिक न्यायाचा वारसा पुढे न्यावा, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले. या पत्रकार परिषदेला समाजातील विविध प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments
Add Comment

लोणावळा स्टेशनवर RPF जवानांचे धाडस; प्रवासी थोडक्यात बचावला

पुणे : रेल्वे प्लॅटफॉर्मवर नेहमीच प्रवाशांची धावपळ सुरू असते. चालू गाडी पकडण्याची घाई अनेकदा जीवघेणे प्रसंग

पुण्यात वाढतेय बिबट्याची दहशत! औंधनंतर आता धानोरीमध्ये बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात बिबट्यांची दहशत वाढली आहे. ग्रामीण भागात दिसणाऱ्या बिबट्यांची

डॉ. गौरी पालवेच्या पार्थिवावर अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; अंत्यसंस्कारादरम्यान वडिलांचा आक्रोश, "तुम्हाला मुली असतील तर आम्हाला न्याय द्या"

अहिल्यानगर : पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जेच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांच्या

इंटरलॉकिंग कामासाठी मध्यरेल्वेच्या 'या' स्थानकांदरम्यान विशेष ब्लॉक! जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा - बीव्हीटी यार्ड, तसेच कल्याण – लोणावळा विभागातील अप यार्डमध्ये

Smriti Mandhana Palash Muchhal Wedding.... एकाच दिवशी दोन धक्के…स्मृतीच्या वडिलानंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली

सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा सांगलीत २३

पुण्यातील सायकल स्पर्धेनिमित्त सिंहगड किल्ल्यावर जाणारी वाहतूक पुढील ३ दिवस बंद, पर्यटकांना पायी मार्ग वापरण्याचा पर्याय

पुणे: पुण्यातील सिंहगड किल्ला नेहमीच पर्यटकांचे आकर्षण केंद्र राहिला आहे. मात्र आजपासून पुढील ३ दिवस सिंहगड