Ambernath traffic: महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्गांबद्दल

अंबरनाथ : महाशिवरात्री उत्सवानिमित्त अंबरनाथमधील प्राचीन अंबरेश्वर शिवमंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. याच पार्श्वभूमीवर आता १४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान शहरातील वाहतुकीत काही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.



हे मार्ग राहतील बंद:


मिळालेल्या माहितीनुसार, काही मुख्य मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी लागू असेल. वैभव हॉटेलकडून शहरात थेट प्रवेश बंद राहील. संबंधित वाहनांना हिंदू स्मशानभूमी, वडवली सेक्शन आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे वळवण्यात येईल. स्वामी समर्थ चौकातून गोविंद तीर्थ पुलाकडे जाणाऱ्या वाहनांनाही ‘नो एन्ट्री’ असेल.

अवजड वाहनांची सोय:


अवजड वाहनांना शहराच्या मध्यवर्ती भागात येण्यास मनाई करण्यात आली आहे. एमआयडीसी आणि अन्य जड वाहनांसाठी आनंदनगर टी-जंक्शन, फॉरेस्ट नाका आणि लादीनाका हे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.



पार्किंगची सुविधा:


लहान वाहनांसाठी हिंदू स्मशानभूमी ते गोविंद तीर्थ पुलादरम्यान पार्किंगची सोय करण्यात आली आहे. बस व मोठ्या वाहनांसाठी लोकनगरी मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. भाविकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Malegaon : चाळीसगाव फाटा ते शिवतीर्थ नवीन जलवाहिनीस महासभेत मंजुरी

Malegaon : ऐन पावसाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटल्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते. यासंदर्भातील

Tribal Development : आदिवासींच्या उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठेचे दार उघडले

- राज्य शासनाचा पुढाकार; 'शबरी नॅचरल्स' ब्रँडचे नाशिकच्या दिंडोरीत प्रक्रिया युनिट मुंबई : राज्यातील आदिवासी

Nagpur Crime : लॉजवर घेऊन गेला अन् 30 तास हात पाय बांधून नको ते केलं, नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक

नागपूर : नागपुरात (Nagpur) 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली

Jalgaon : जळगावकरांनो लक्ष द्या ! शिव कॉलनी पुलाच्या कामासाठी वाहतूक वळवणार; 'हे' असतील पर्यायी मार्ग

Jalgaon : जळगाव शहरातील शिव कॉलनीतील रेल्वे मार्गावरील समांतर पूल आणि भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर गती

State Government : आयुष्यमान भारत आणि जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहारांप्रकरणी एसआयटी

 १५ हजार ४०७ उपचारांचे दावे संशयास्पद; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई : आयुष्मान भारत-पंतप्रधान

Jalgaon Railway : रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; ‘कोयंबतूर–जयपूर’ एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार; जळगावकरांना रेल्वेचा दिलासा

Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी