Grishneshwar temple : शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! महाशिवरात्रीला घृष्णेश्वराचे 'गाभारा दर्शन' सुरूच राहणार

वेरूळ : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरातील दर्शनाबाबत प्रशासनाने आपला निर्णय बदलला असून भाविकांना मोठा दिलासा दिला आहे. दरवर्षी होणारी अलोट गर्दी लक्षात घेता प्रशासनाने सुरुवातीला गाभारा दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता महाशिवरात्रीला येणाऱ्या लाखो शिवभक्तांना पूर्वीप्रमाणेच थेट गाभाऱ्यात प्रवेश मिळणार आहे. भाविकांना केवळ दर्शनच नाही, तर महादेवाच्या पिंडीला स्पर्श करून दर्शन घेता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या या सकारात्मक निर्णयामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सुलभ दर्शनासाठी आता मंदिर प्रशासनाकडून विशेष तयारी केली जात आहे.



गाभारा दर्शन बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे भाविकांमध्ये नाराजी


महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वेरूळ येथील १२ वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर प्रशासनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पाहायला मिळत आहे. गर्दीचे नियंत्रण आणि सुरक्षेचे कारण देत यावर्षी महाशिवरात्रीला 'गाभारा दर्शन' बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासकीय बैठकीत घेण्यात आला होता. आता नव्या नियमानुसार भाविकांना पिंडीला स्पर्श करून किंवा डोके टेकवून दर्शन घेण्याऐवजी केवळ दरवाजातूनच दर्शन घेता येणार होते. ओंकारेश्वर मंदिराच्या धर्तीवर भाविकांना बाहेरूनच जलाभिषेक करण्याची सुविधा देण्यात येणार होती. ग्रामस्थांना आधार कार्ड दाखवून पहाटे ६ वाजेपर्यंतच दर्शनाची मुभा देण्यात आली होती. देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. "दर्शन घेण्यासाठी ४-५ तास लागले तरी चालतील, मात्र आम्हाला गाभाऱ्यात जाऊन स्पर्श दर्शनच हवे," अशी मागणी भाविकांकडून होत आहे. १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर, भाविकांच्या या तीव्र भावना लक्षात घेऊन प्रशासन आपल्या निर्णयात बदल करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



प्रशासनाने मागे घेतला बंदीचा निर्णय


शेकडो वर्षांची 'स्पर्श दर्शनाची' परंपरा खंडित न करता भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार आहे. सुरुवातीला गर्दीच्या नियोजनासाठी घातलेली बंदी आता पूर्णपणे उठवण्यात आली आहे. गाभारा दर्शन आणि स्पर्श दर्शनामुळे भाविकांना रांगेत अधिक वेळ लागण्याची शक्यता असली, तरी भाविकांनी या निर्णयाचे मनापासून स्वागत केले आहे. प्रशासनाने दाखवलेल्या या लवचिक भूमिकेबद्दल शिवभक्तांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत. १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या यात्रेसाठी आता देशभरातून येणाऱ्या भाविकांचा उत्साह द्विगुणीत झाला असून, मंदिर परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Nitesh Rane : ओसरगाव टोलनाक्यावर 'एमएच-०७' वाहनांना टोलमाफी

 पालकमंत्री नितेश राणे यांची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; स्वतंत्र मार्गिका, व्यावसायिक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, दोन चिमुकल्यांसह चालक गंभीर

Buldhana : राज्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पुन्हा एकदा

Forest Minister Ganesh Naik : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशात बिबट सफारी विकसित करणार

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबाच्या धर्तीवर व्याघ्र प्रकल्प मुंबई :

Chhagan Bhujbal : शिवभोजन केंद्र चालकांना दरमहा अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक मंत्री छगन भुजबळ यांचे विधान परिषदेत आश्वासन

बंद शिवभोजन केंद्रे पुन्हा सुरू करण्यास प्राधान्य; निधीसाठी अर्थ विभागाशी चर्चा करणार मुंबई : राज्यातील

Maharashtra Monsoon 2026 : राज्यात २४ ते २७ जूनदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण