अलिबागच्या समुद्रात बेपत्ता झालेल्या मुंबईतील दोन तरुणाचा शोध सुरू

अलिबाग  : अलिबाग शहराजवळील जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील समुद्रकिनारी फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी दोघे तरुण समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आत ओढले जाऊन बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर पोलीस व स्थानिक प्रशासनाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.


नवी मुंबईतील सानपाडा येथून चार मित्र अलिबागमध्ये फिरण्यासाठी आले होते. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील समुद्रकिनारी पोहोण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्यापैकी दोन तरुण शशांक सिंग (वय १९, रा. उलवे, उरण) व पलाश पखर (वय १९, रा. सानपाडा, नवी मुंबई) हे समुद्राच्या भरतीच्या प्रवाहात वाहून जात बेपत्ता झाले. या घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. मात्र रविवारी दुपारपर्यंत या दोन्ही तरुणांचा शोध लागला नव्हता. स्थानिक मच्छीमारांची मदत पोलिसांनी घेत समुद्रात शोधमोहीम सुरू केली असून, कोस्ट गार्ड व आपत्ती व्यवस्थापन पथकांनाही माहिती देण्यात आली आहे. भरती-ओहोटीच्या परिस्थितीमुळे शोधकार्यात अडथळे येत असले, तरी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Add Comment

Satyajeet Tambe : सत्यजित तांबे अखेर भाजपच्या उंबरठ्यावर? मामा बाळासाहेब थोरातांनीच दिले 'ग्रीन सिग्नल'; म्हणाले, 'तो सज्ञान...

अहिल्यानगर : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे भाचे आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष

धक्कादायक! शिरुरमध्ये बालकावर बिबट्याचा हल्ला, संतप्त ग्रामस्थांनी पेटवले वनविभागाचे कार्यालय

पुणे: शिरुर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये १३ वर्षीय मुलावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात निष्पाप मुलाचा दुर्दैवी

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलणार ?

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुतोवाच नागपूर : येत्या ८ डिसेंबरपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे

आंदोलने-मोर्चे काढून सत्ता मिळत नाही; जनता महायुतीसोबत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांना चपराक पंढरपूर :“आम्ही काम केले आहे, जनता पाहते आहे. आंदोलने-मो o-.र्चे

साखरेचा गाळप हंगाम सुरू, पहिल्याच दिवशी २८ कारखान्यांना परवाने

पुणे (प्रतिनिधी): राज्यातील साखर गाळप हंगाम शनिवारपासून सुरु झाला. पहिल्याच दिवशी २८ साखर कारखान्यांना गाळप

काय सांगता ? २८० किलोच्या हिंदकेसरी कॅप्टन बैलाची इतक्या लाखांना विक्री

छत्रपती संभाजीनगर : फक्त २८० किलो वजन, चमकदार शरीर, मजबूत बांधा, वेगवान चाल यामुळे संपूर्ण मराठवाड्यात लोकप्रिय