पाकिस्तानची अन्न-पाणी सुरक्षा संकटात

सिंधू जलवाटप करार स्थगित केल्याचा परिणाम; सिडनीतील संस्थेचा अहवाल


नवी दिल्ली : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जलवाटप करार तात्पुरता स्थगित केला होता. त्यामुळे पाकिस्तानवर पाणी तुटवड्याचे गंभीर संकट आहे, असा इशारा सिडनीतील इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेने प्रकाशित केलेल्या इकॉलॉजिकल थ्रीट रिपोर्ट २०२५ मध्ये दिला आहे.


सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांवरील पाकिस्तानच्या अवलंबित्वामुळे भारताचा हा निर्णय पाकसाठी गंभीर संकट ठरू शकतो. ‘सिंधूच्या प्रवाहात व्यत्यय येणे पाकिस्तानच्या अन्नसुरक्षेस थेट धोका निर्माण करू शकते. जर भारताने प्रवाह पूर्णपणे किंवा मोठ्या प्रमाणावर थांबवले, तर पाकिस्तानच्या घनसंख्येने व्यापलेल्या मैदानांमध्ये विशेषतः हिवाळा आणि कोरड्या हंगामात प्रचंड पाण्याचा तुटवडा निर्माण होईल,’ असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मे २०२५ मध्ये भारताने सालाल आणि बगलीहार धरणांवर फ्लशिंग ऑपरेशन्स केले, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये काही दिवसांसाठी चिनाब नदी कोरडी पडली. धरणाचे दरवाजे अचानक बंद करून नद्यांवर परिणाम होऊ शकतो, पण हे करताना पाकिस्तानला पूर्वसूचना दिली गेली नव्हती. १९६० साली जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत-पाकिस्तानात सिंधू जलवाटप करार झाला. या करारन्वये सहा नद्यांचे विभाजन केले गेले. पूर्व वाहिनी नद्या रावी, बियास, सतलज यांचे नियंत्रण भारताकडे, तर पश्चिम वाहिनी नद्या सिंधू, झेलम, चिनाबचे नियंत्रण पाकिस्तानकडे आहे. दोन्ही देशांत तीन युद्धे झाली, तरी हा करार शाबूत होता. सन २००० नंतर राजकीय तणाव वाढल्यामुळे या कराराच्या स्थैर्यावर परिणाम झाला. मोदी सरकारने पूर्व नद्यांचा उपयोग वाढवण्याचा प्रयत्न केला. एप्रिल २०२५ मध्ये जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने हा करार स्थगित केला होता. पंतप्रधान मोदींनी पाणी आणि रक्त एकत्रित वाहू शकत नाही, असे बजावले होते.


पाकिस्तानच्या कृषी क्षेत्राचा सुमारे ८० टक्के अवलंब सिंधू नदी प्रणालीवर आहे. पाकिस्तानमध्ये सिंधू नदीचे जलसाठे फक्त सुमारे ३० दिवसांचे पाणी धरू शकतात; त्यामुळे पाण्याच्या पुरवठ्यात कोणताही मोठा तुटवडा उद्भवला, तर तो भयंकर ठरू शकतो.', असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Monkey's Pool Party Inside Taj Mahal : ताजमहालच्या फाउंटनमध्ये माकडांची 'पूल-पार्टी'! उकाड्यापासून वाचण्यासाठी वानरसेनेची धम्माल; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवत आहेत. या कडक उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी जशी

India Slam Pakistan at UN : 'खोट्या गोष्टी पसरवण्याची पाकिस्तानला सवय', संयुक्त राष्ट्रात काश्मीर प्रश्नावर भारताची स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) त्याची खरी जागा पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. जम्मू आणि

Cockroach Janta Party : नावात 'कॉकरोच' पण दिल्लीच्या उन्हात निघाली हवा! 'VIP' नेते सौरव दास यांचा सरंजामशाही चेहरा उघडा

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत एकीकडे 'नीट २०२६' (NEET 2026) परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश

KCET UGCET निकाल २०२६ जाहीर : यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचा डंका; मुलांपेक्षा तब्बल ४१ हजार अधिक मुलींची परीक्षेला उपस्थिती

बंगळुरू : कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाकडून (KEA) घेण्यात आलेल्या बहुचर्चित 'कर्नाटक सामायिक प्रवेश परीक्षेचा' (KCET UGCET 2026)

Punjab Accident: एका क्षणात होत्याचं नव्हतं; अस्थी विसर्जनासाठी निघालेल्या कुटुंबाचा भीषण अपघात, ९ जण जागीच ठार

पंजाब : पंजाबमधील फिरोजपूर येथे शनिवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात (Road Accident) ९ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर

Ludhiana Blast : रेल्वे स्थानकावर अचानक भीषण स्फोटाचा आवाज! लुधियाना स्टेशनवर खळबळ; सुरक्षा यंत्रणा सतर्क

लुधियाना : पंजाबमधील लुधियाना रेल्वे स्थानक शुक्रवारी (५ जून) सकाळी झालेल्या एका रहस्यमय स्फोटामुळे हादरून गेले.