गणेश काळे हत्या प्रकरण, आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी

पुणे: माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने, गायकवाड टोळीचा म्होरक्या समीर काळे याच्या भावाची हत्या केली. आंदेकर टोळीच्या म्होरक्या बंडू आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आणि नातू स्वराज वाडेकर यांच्या सांगण्यावरून पुण्याच्या कोंढव्यात रिक्षाचालक गणेश काळेवर चार जणांनी हल्ला केला. अमन शेख आणि अरबाज पटेल यांनी दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने गणेश काळेवर गोळ्या झाडून नंतर कोयत्याने वार केला. या प्रकरणाबाबत काल (२ नोव्हेंबर) कोर्टात सुनावणी पार पडली.


सुनावणीवेळी आरोपी अमन शेख, मयूर वाघमारे आणि अरबाज पटेल या तिघांना कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी तपास तपास अधिकारी निरीक्षक नवनाथ जगताप आणि सरकारी वकील प्रियंका वेंगुर्लेकर यांनी म्हटले की, "ही पिस्तुले व कोयता आरोपींनी कुठून आणला, गुन्ह्याचा कट कुठे रचला, त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, आरोपी आणि अल्पवयीन मुले एकमेकांच्या संपर्कात कशी आली, याची माहिती घ्यायची आहे. तसेच आरोपींचे मोबाईल व ई-मेल तपासून त्यांना खुनाची सुपारी कोणी दिली, याचा तपास करायचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी."




तर आरोपींचे वकील मिथुन चव्हाण म्हणाले की, "हत्येत वापरण्यात आलेली दोन पिस्तुले मिळाली आहेत. या प्रकरणातील तीन आरोपी आधीच जेलमध्ये आहेत. या आरोपींना जुन्या गुन्ह्याच्या आधारावर आरोपी करायचे असे चित्र पोलिसांनी तयार केले आहे. ज्याची हत्या करण्यात आली त्याचा भाऊ वनराज आंदेकर हत्येत सहभागी होता म्हणून त्या गुन्ह्याचा आणि या गुन्ह्याचा काय संबंध आहे? पोलीस कोठडीची गरज काय ? केवळ वाहन शोधण्यासाठी २ दिवसाची पोलीस कोठडी दिली तर हरकत नाही." आता या प्रकरणात अजून काय धागेदोरे मिळतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती मुंबई : महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक

महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासमोर मोठे आव्हान: वर्षात ४१ वाघांना मुकलो, मानवनिर्मित कारणांमुळे धोक्यात वाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये २०२५ या एकाच वर्षात तब्बल ४१ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती

काजू उत्पादक शेतकऱ्याला जगवण्यासाठी आयात शुल्कात २० टक्क्यांची वाढ करा - आमदार निलेश राणे

- निलेश राणे यांची विधानसभेत मागणी; अमली पदार्थ, गो-हत्या आणि बेकायदा वृक्षतोडीवरून धरले धारेवर मुंबई : कोकणातील

'BMC सोबत समन्वयातून टिळक मनपा मार्केटमधील कोळी बांधवांच्या समस्यांवर तोडगा काढणार'; मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

बीएमसीसोबत चर्चा करून मार्केटच्या पुनर्विकासावर तोडगा काढण्याचे  मुंबई : लोकमान्य टिळक महापालिका मार्केटच्या