गणेश काळे हत्या प्रकरण, आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी

पुणे: माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने, गायकवाड टोळीचा म्होरक्या समीर काळे याच्या भावाची हत्या केली. आंदेकर टोळीच्या म्होरक्या बंडू आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आणि नातू स्वराज वाडेकर यांच्या सांगण्यावरून पुण्याच्या कोंढव्यात रिक्षाचालक गणेश काळेवर चार जणांनी हल्ला केला. अमन शेख आणि अरबाज पटेल यांनी दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने गणेश काळेवर गोळ्या झाडून नंतर कोयत्याने वार केला. या प्रकरणाबाबत काल (२ नोव्हेंबर) कोर्टात सुनावणी पार पडली.


सुनावणीवेळी आरोपी अमन शेख, मयूर वाघमारे आणि अरबाज पटेल या तिघांना कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी तपास तपास अधिकारी निरीक्षक नवनाथ जगताप आणि सरकारी वकील प्रियंका वेंगुर्लेकर यांनी म्हटले की, "ही पिस्तुले व कोयता आरोपींनी कुठून आणला, गुन्ह्याचा कट कुठे रचला, त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, आरोपी आणि अल्पवयीन मुले एकमेकांच्या संपर्कात कशी आली, याची माहिती घ्यायची आहे. तसेच आरोपींचे मोबाईल व ई-मेल तपासून त्यांना खुनाची सुपारी कोणी दिली, याचा तपास करायचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी."




तर आरोपींचे वकील मिथुन चव्हाण म्हणाले की, "हत्येत वापरण्यात आलेली दोन पिस्तुले मिळाली आहेत. या प्रकरणातील तीन आरोपी आधीच जेलमध्ये आहेत. या आरोपींना जुन्या गुन्ह्याच्या आधारावर आरोपी करायचे असे चित्र पोलिसांनी तयार केले आहे. ज्याची हत्या करण्यात आली त्याचा भाऊ वनराज आंदेकर हत्येत सहभागी होता म्हणून त्या गुन्ह्याचा आणि या गुन्ह्याचा काय संबंध आहे? पोलीस कोठडीची गरज काय ? केवळ वाहन शोधण्यासाठी २ दिवसाची पोलीस कोठडी दिली तर हरकत नाही." आता या प्रकरणात अजून काय धागेदोरे मिळतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक नियोजनात बदल; काही मार्गांवर प्रवेश मर्यादित

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, या प्रक्रियेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी

मशीदीवरचे भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देऊन उद्धव ठाकरेंनी प्रचार केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; कुणाचाही महापौर झाला तरी आम्ही भोंग्यांना परवानगी देणार नाही मुंबई :

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

BMC Election 2026 : महापालिका निकाल प्रक्रियेत बदल; मुंबईत मतमोजणीसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान