असीम सरोदेंची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवले

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचा कठोर निर्णय; २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला


मुंबई : न्यायव्यवस्थेबद्दल वादग्रस्त विधान करणे प्रसिद्ध वकील अ‍ॅड. असीम सरोदे यांना चांगलेच महागात पडले आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा (BCMG) यांनी त्यांची वकिलीची सनद तब्बल तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. एवढेच नाही, तर त्यांच्यावर २५ हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. या निर्णयामुळे कायदेविषयक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वरळी येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात अ‍ॅड. सरोदे यांनी न्यायव्यवस्था, राज्यपाल (Governor) आणि विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह विधाने केली होती. या वक्तव्यांमुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाला असून न्यायालयांविषयी नागरिकांमध्ये अविश्वास निर्माण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.


या प्रकरणी १९ मार्च २०२४ रोजी बार कौन्सिलकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली होती. अ‍ॅड. विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या तक्रारीची दखल घेत सखोल चौकशी केली आणि त्यानंतर हा मोठा निर्णय घेतला.


विशेष म्हणजे, बार कौन्सिलने अ‍ॅड. असीम सरोदे यांना आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लेखी माफी मागण्याची संधी दिली होती. मात्र, त्यांनी ही संधी नाकारल्यामुळे त्यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.


या कारवाईमुळे अ‍ॅड. सरोदे यांना पुढील तीन महिने कोणत्याही न्यायालयात युक्तिवाद करता येणार नाही. अ‍ॅड. सरोदे हे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या सुनावणीत सहभागी असणारे वकील आहेत. अशा परिस्थितीत त्यांची सनद रद्द झाल्यामुळे या खटल्याच्या पुढील प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.


बार कौन्सिलने घेतलेल्या या निर्णयामुळे वकिलांच्या सार्वजनिक वादग्रस्त वक्तव्यांबाबत त्यांची भूमिका किती कठोर आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. न्यायव्यवस्थेचा मान राखणे प्रत्येक वकिलासाठी किती महत्त्वाचे आहे, याचा संदेश यातून देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Monsoon in Jalgaon : पावसाची ९२ टक्के तूट; पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतेत

जळगाव : जळगाव जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाने मोठी ओढ दिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान

Weather Station : प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई : फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक

Beed Murder Case: धक्कादायक! भांडण सोडवायला गेला आणि जीव गमावून बसला

बीडमध्ये हॉटेल चालकाची हत्या Beed Murder Case : बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यात एका २५ वर्षीय हॉटेल चालकाची चाकूने

Devendra Fadnavis : ९७ हजार ७०६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

 फडणवीस सरकारचा नवा विक्रम; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २० हजार ७५२ कोटींची तरतूद मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या

Ambenali Ghat: २०० फूट दरीत कोसळलेल्या तरुणाला मिळाली 'नवसंजीवनी'; स्थानिक ट्रेकर्सचे धाडसी ऑपरेशन!

महाबळेश्वर (सातारा) : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि घनदाट जंगलासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या आंबेनळी

Devendra Fadnavis : महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार मुंबई : "राज्य विधिमंडळाचे सोमवारपासून