वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या प्रकाराला आता आळा घातला जाणार असून या मार्गावरील तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा त्वरीत होण्यासाठी महापालिकेच्यावतीने याचा शोध घेवू त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येत आहे. याठिकाणचे पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या पर्जन्य जलवाहिनी या मोडकळीस असल्याने तसेच काही वाहिन्या अस्तित्वातच नसल्याने अशा मिसिंग लिंकचा शोध घेवून कामाला सुरुवात केल्याने या भागातील तुंबणाऱ्या पाण्याची समस्या कायमचीच निकालात निघाली जाणार आहे.


वांद्रे पश्चिम भागातील एस व्ही रोड आणि के सी रोड येथे पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात पाणी साचून राहत असल्याने स्थानिकांसह लोकप्रतिनिधीकडून वारंवार तक्रारी येत असल्याने महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या प्रत्यक्ष पाहणीमध्ये पर्जन्य जलवाहिनी या मोडकळीस आलेल्या असल्यामुळे तसेच काही ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्या अस्तित्वात नसल्यामुळे या ठिकाणच्या पाण्याचा निचरा होत नाही, परिणामी पावसाचे पाणी साचत आहे. तसेच पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी अस्तित्वात असलेली यंत्रणा अपुरी असल्यामुळे जलवाहिन्यांची रुंदी ही १.२ मीटर एवढी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


त्यानुसार पर्जन्य जलवाहिची क्षमता वाढवण्याच्यादृष्टीकोनातून हाती कामे घेण्याकरता निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी ११.२३ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या कामांसाठी


नरेंद्र एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील पावसाळी पाण्याचा निचरा जलद गतीने होऊन पावसाळ्यात पाणी साचण्याच्या प्रकाराला आळा बसेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

Viral Video :चालत्या बाईकवर 'हायव्होल्टेज' ड्रामा!...लोक पाहत राहिलीत..!

मुंबई: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण सध्या एका अशा व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे जो पाहून

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण

Mumbai : किरकोळ वादातून मारामरी,रागाच्या भरात मित्रानेच घेतला...नक्की काय घडलं ?

Mumbai :मुंबईतील एका परिसरात अत्यंत संतापजनक घटना घडली असून, बोलता बोलता वाद झाल्याने एका तरुणावर त्याच्याच

BMC Election 2026 : ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, मनसेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; याचिकाकर्त्यांना सुनावले खडेबोल

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात

मकरसंक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना गोड

आचारसंहितेतून वाट काढली ! मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला

कोकण रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका

वर्षभरात २० कोटींचा दंड वसूल मुंबई : कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी व्हावा यासाठी