बंडगार्डनमध्ये भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू ; तिसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : रविवारी पहाटे बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव कारने मेट्रो प्रकल्पाच्या खांबाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक एवढी जबरदस्त होती की कारचा चक्काचूर झाला. या अपघातात ऋत्विक उर्फ ओम विनायक भंडारी (२३, रा. पिंपरी), यश प्रसाद भंडारी (२३, रा. थेरगाव, पिंपरी) आणि खुशवंत किशोर टेकवानी (१९, रा. बीड) या तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ऋत्विक आणि यश यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या खुशवंतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेही रविवारी पहाटे कारने प्रवास करत होते.


चालक ऋत्विक भंडारी याचे नियंत्रण सुटल्याने कार थेट मेट्रोच्या खांबावर जाऊन आदळली. अपघातानंतर घटनास्थळी लष्कर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त संगीता अल्फान्सो-शिंदे, वरिष्ठ निरीक्षक संगीता जाधव, तसेच अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. दोघांचे मृतदेह आणि जखमीला ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान खुशवंतचा मृत्यू झाला.


याप्रकरणी पोलिस अंमलदार रूपेश पांगारे यांनी फिर्याद दाखल केली असून कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेज जप्त केले असून अपघाताचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. मृतांपैकी ऋत्विक भंडारी हा एमबीए फायनान्सचा विद्यार्थी होता, यश भंडारी आयटी कंपनीत कार्यरत होता, तर खुशवंत टेकवानी हा पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये बीटेकचं शिक्षण घेत होता. तरुण वयात या तिघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

अखेर स्वप्न पूर्ण, भारताने जिंकला महिला विश्वचषक; दीप्तीने घेतल्या ५ विकेट

नवी मुंबई : अखेर भारताचे स्वप्न साकार झाले. भारताच्या महिला संघाने आयसीसी वर्ल्डकप पहिल्यांदाच जिंकला. नाणेफेक

अजित पवार सलग चौथ्यांदा राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची सलग चौथ्यांदा राज्याच्या

नौदलासाठी इस्रोने प्रक्षेपित केला उपग्रह

श्रीहरिकोटा : भारतीय नौदलाठी इस्रोने LVM3-M5/CMS-03 या रॉकेटमधून एका उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहामुळे

साखरेचा गाळप हंगाम सुरू, पहिल्याच दिवशी २८ कारखान्यांना परवाने

पुणे (प्रतिनिधी): राज्यातील साखर गाळप हंगाम शनिवारपासून सुरु झाला. पहिल्याच दिवशी २८ साखर कारखान्यांना गाळप

स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी, मोडला मिताली राजचा विक्रम

नवी मुंबई : डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू असलेल्या आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ च्या फायनल मॅचमध्ये भारतीय

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पुनरागमन करत शफाली वर्माची दमदार खेळी

नवी मुंबई : आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ चा अंतिम सामना टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात सुरू आहे. या