बंडगार्डनमध्ये भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू ; तिसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : रविवारी पहाटे बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव कारने मेट्रो प्रकल्पाच्या खांबाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक एवढी जबरदस्त होती की कारचा चक्काचूर झाला. या अपघातात ऋत्विक उर्फ ओम विनायक भंडारी (२३, रा. पिंपरी), यश प्रसाद भंडारी (२३, रा. थेरगाव, पिंपरी) आणि खुशवंत किशोर टेकवानी (१९, रा. बीड) या तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ऋत्विक आणि यश यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या खुशवंतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेही रविवारी पहाटे कारने प्रवास करत होते.


चालक ऋत्विक भंडारी याचे नियंत्रण सुटल्याने कार थेट मेट्रोच्या खांबावर जाऊन आदळली. अपघातानंतर घटनास्थळी लष्कर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त संगीता अल्फान्सो-शिंदे, वरिष्ठ निरीक्षक संगीता जाधव, तसेच अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. दोघांचे मृतदेह आणि जखमीला ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान खुशवंतचा मृत्यू झाला.


याप्रकरणी पोलिस अंमलदार रूपेश पांगारे यांनी फिर्याद दाखल केली असून कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेज जप्त केले असून अपघाताचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. मृतांपैकी ऋत्विक भंडारी हा एमबीए फायनान्सचा विद्यार्थी होता, यश भंडारी आयटी कंपनीत कार्यरत होता, तर खुशवंत टेकवानी हा पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये बीटेकचं शिक्षण घेत होता. तरुण वयात या तिघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

संजनाच्या पोस्टमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का, लग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात सूरज चव्हाणच्या घरी गुड न्यूज?

मुंबई: बिग बॉस मराठीचा पाचव्या पर्वाचा विजेता ठरलेला सूरज चव्हाण कायमच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो.

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला