स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी, मोडला मिताली राजचा विक्रम


नवी मुंबई : डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू असलेल्या आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ च्या फायनल मॅचमध्ये भारतीय सलामीवीर स्मृती मंधानाने ५८ चेंडूत आठ चौकार मारत ४५ धावा केल्या. ती क्लो ट्रायॉनच्या चेंडूवर सिनालो जाफ्ताकडे झेल देऊन परतली. पण बाद होण्याआधी स्मृती मंधानाने एक ऐतिहासिक कामगिरी केली. स्मृतीने एका महिला वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. तिने मिताली राजचा विक्रम मोडीत काढला.



स्मृतीने आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ मध्ये ४३४ धावा केल्या. ही कामगिरी करुन स्मृतीने मिताली राजचा २०१७ चा एका महिला वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा कराऱ्या भारतीय खेळाडूचा विक्रम मोडला. मितालीने २०१७ च्या महिला वर्ल्डकपमध्ये ४०९ धावा केल्या होत्या. आता एका महिला वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत स्मृती मंधाना पहिल्या आणि मिताली राज दुसऱ्या स्थानी आहे.



एका महिला वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांची यादी




  1. स्मृती मंधाना - ४३४ धावा, २०२५

  2. मिताली राज - ४०९ धावा, २०१७

  3. पूनम राऊत - ३८१ धावा, २०१७

  4. हरमनप्रीत कौर - ३५९ धावा, २०१७

  5. स्मृती मंधाना - ३२७ धावा, २०२२


Comments
Add Comment

अखेर स्वप्न पूर्ण, भारताने जिंकला महिला विश्वचषक; दीप्तीने घेतल्या ५ विकेट

नवी मुंबई : अखेर भारताचे स्वप्न साकार झाले. भारताच्या महिला संघाने आयसीसी वर्ल्डकप पहिल्यांदाच जिंकला. नाणेफेक

अजित पवार सलग चौथ्यांदा राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची सलग चौथ्यांदा राज्याच्या

IPL 2026 मिनी ऑक्शन परदेशात ? मोठी बातमी समोर आली!

मुंबई : आयपीएल २०२६ हंगामाची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. सर्व संघांनी रणनिती आखायला सुरुवात केली असून, या वेळी

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पुनरागमन करत शफाली वर्माची दमदार खेळी

नवी मुंबई : आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ चा अंतिम सामना टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात सुरू आहे. या

भारताची फटकेबाजी, द. आफ्रिकेला दिले मोठे आव्हान

नवी मुंबई : महिला वर्ल्डकप २०२५ ची फायनल मॅच डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू आहे. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने

होबार्टमध्ये मारली बाजी, Team India ने साधली बरोबरी

होबार्ट : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत भारताने बरोबरी साधली आहे.