Mumbai: पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघड; श्रीमंत पुरुषांना जाळ्यात अडकवून ...

मुंबई: सध्या बाजारात विविध प्रकारचे डेटिंग अॅप सुरू आहेत. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी या डेटिंग अॅपवर सक्रिय असतात. या अॅपच्या माध्यमातून नवे नातेसंबंध जोडले जात असतात. मात्र यादरम्यान या अॅपच्या माध्यमातून श्रीमंत पुरुषांना जाळ्यात अडकवून पैसे उकळण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील साकीनाका-पवई जवळील एका हॉटेलमधील मोठं रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केलं आहे.
.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ ते ३० तरुणी दिल्लीतून मुंबईला आणण्यात आल्या होत्या. या तरुणी एका प्रसिद्ध डेटिंग अॅपच्या माध्यमातून श्रीमंत पुरुषांना जाळ्यात ओढायच्या. डेटिंग अॅपवर लाइक करुन ते चॅटिंगची सुरुवात करायच्या. चॅट केल्यानंतर या तरुणी पुरुषांना भेटायला बोलवित होत्या. घाटकोपरच्या साकीनाका येथील कॅफे क्लब कॅफेत हा सर्व प्रकार सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे कॅफेचा मालकही या रॅकेटमध्ये सक्रिय होता. तरुणाला कॅफेत आणल्यानंतर मुली त्यांना धमकी द्यायच्या. त्यांना लैंगिक अत्याचाराची तक्रार करण्याची भीती दाखवली जात होती. तर अनेकदा मुली ऑर्डर करत त्याचे अव्वाच्या सव्वा बिल व्हायचे. अनेकदा हे बिल २५ ते ५० हजारांहून अधिक होत असे.


पोलिसांनी जेव्हा कॅफेवर छापा टाकला तेव्हा एका पीडित तरुणाला खाली बसवत त्याच्यावर बाऊंसर्सकडून धाक दाखवत पैसे वसुली सुरू होती. याप्रकरणी साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. याशिवाय पोलिसांनी हा कॅफे सील केला आहे. सध्या ३ मुलींना अटक करण्यात आली असून त्यांना खास या रॅकेटसाठी दिल्लीहून आणण्यात आलं होतं.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील