विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पुनरागमन करत शफाली वर्माची दमदार खेळी

नवी मुंबई : आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ चा अंतिम सामना टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. याच सामन्यात प्रतिका रावलच्या जागी आलेल्या शफाली वर्माने अप्रतिम फलंदाजी करत सगळ्यांचे मन जिंकले आहे . आपल्या वनडे करिअरमधील ही सर्वात मोठी खेळी करत शफालीने पुनरागमन केले आहे.


टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरली. शेफालीने अवघ्या ७८ चेंडूंमध्ये १११.५४ च्या स्ट्राईक रेटने ८७ धावांची जबरदस्त खेळी साकारली. तिच्या खेळीत ७ चौकार आणि २ षटकार होते.


याआधी बांगलादेश विरुद्धच्या लीग स्टेजमधील शेवटच्या सामन्यात फिल्डिंग करताना भारताची सलामी फलंदाज प्रतिका रावल जखमी झाली, त्यामुळे तिला आजचा अंतिम सामना हा खेळता आला नाही, याच्या आधीच्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तिने शतक ठोकले होते. त्यामुळे तिचं बाहेर जाणं हे टीमसाठी मोठा धक्का होतं. त्या जागी बराच काळ संघाबाहेर राहिलेली तरुण खेळाडू शफाली वर्माला पुन्हा संघात स्थान मिळालं.


पण तिच्यावर पहिल्याच संधीपासून चांगली कामगिरी करण्याचा दबाव होता . सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिने फक्त ५ चेंडूंमध्ये १० धाव केल्या, त्यामुळे काही चाहत्यांनी तिच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला पण फायनलमध्ये दमदार खेळी करून तिने सर्वांचीच तोंडे बंद केली आहेत.

Comments
Add Comment

एकदिवसीय मालिकेला ३० नोव्हेंबरपासून सुरुवात, मात्र शुभमन आणि श्रेयस संघातून बाहेर! केएल राहुल होणार संघाचा कॅप्टन ?

मुंबई: येत्या ३० नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. मात्र एकदिवसीय

पहिल्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिका ६ बाद २४७

गुवाहाटी (वृत्तसंस्था): गुवाहाटीतील एसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट

T20 World Cup 2026: संभाव्य गट जाहीर होण्याआधीच माहिती लीक; भारत–पाकिस्तान पुन्हा एकाच गटात

मुंबई : टी२० विश्वचषक २०२६ ची तयारी जोरात सुरू असून, अधिकृत गटवाटप २५ नोव्हेंबरला जाहीर होणार असले तरी संभाव्य

Smruti Mandhana : स्मृती मंधानाच्या लग्नसराईला भारतीय महिला संघाची हजेरी! सोशल मीडीयावर मज्जा मस्तीचे व्हिडीओ व्हायरल

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि पलाश यांच्या विवाहसोहळ्याची धामधूम सध्या जोरात

कसोटी सामन्यानंतर लगेचच भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिका! दक्षिण आफ्रिकेच्या संघात होणार अनेक खेळाडूंचे पुनरागमन

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून गुवाहाटीमध्ये सुरूवात होणार आहे.

टीम इंडियासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान

गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना