विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पुनरागमन करत शफाली वर्माची दमदार खेळी

नवी मुंबई : आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ चा अंतिम सामना टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. याच सामन्यात प्रतिका रावलच्या जागी आलेल्या शफाली वर्माने अप्रतिम फलंदाजी करत सगळ्यांचे मन जिंकले आहे . आपल्या वनडे करिअरमधील ही सर्वात मोठी खेळी करत शफालीने पुनरागमन केले आहे.


टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरली. शेफालीने अवघ्या ७८ चेंडूंमध्ये १११.५४ च्या स्ट्राईक रेटने ८७ धावांची जबरदस्त खेळी साकारली. तिच्या खेळीत ७ चौकार आणि २ षटकार होते.


याआधी बांगलादेश विरुद्धच्या लीग स्टेजमधील शेवटच्या सामन्यात फिल्डिंग करताना भारताची सलामी फलंदाज प्रतिका रावल जखमी झाली, त्यामुळे तिला आजचा अंतिम सामना हा खेळता आला नाही, याच्या आधीच्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तिने शतक ठोकले होते. त्यामुळे तिचं बाहेर जाणं हे टीमसाठी मोठा धक्का होतं. त्या जागी बराच काळ संघाबाहेर राहिलेली तरुण खेळाडू शफाली वर्माला पुन्हा संघात स्थान मिळालं.


पण तिच्यावर पहिल्याच संधीपासून चांगली कामगिरी करण्याचा दबाव होता . सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिने फक्त ५ चेंडूंमध्ये १० धाव केल्या, त्यामुळे काही चाहत्यांनी तिच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला पण फायनलमध्ये दमदार खेळी करून तिने सर्वांचीच तोंडे बंद केली आहेत.

Comments
Add Comment

न्यूझीलंडचा ५० धावांनी विजय

शिवम दुबेची तुफानी खेळी व्यर्थ शाखापट्टणम : विशाखापट्टणम येथे झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने

Ajit Pawar Passed Away : अजित पवारांच्या अपघाती निधनावर क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन (MOA) चे अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली आणि दुःखद

आयसीसी क्रमवारीत भारताचे वर्चस्व, अभिषेकचे अव्वल स्थान भक्कम; तर सूर्याची वादळी एन्ट्री

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंचे निर्विवाद

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली