गणेश काळेच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, शस्त्रे जप्त


पुणे : कोंढवा परिसरात गणेश काळे या रिक्षाचलकाची हत्या करण्यात आली. गणेशवर आधी गोळीबार केला गेला नंतर अतिशय जवळून कोयत्याने वार करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आणि शस्त्रसाठा जप्त केला. अमन मेहमबुब शेख (२२), अरबाज पटेल, आणि दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी गणेश काळेच्या हत्येप्रकरणी अटक केली. शिवापूर परिसरातून या चौघांना कोंढवा डी बी पथकाने अटक केली आहे.


पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यासाठी वापरलेली दोन पिस्तुले आणि दोन इतर शस्त्र अशी एकूण चार शस्त्र जप्त केली आहेत. अटक केलेल्या चौघांची पोलीस चौकशी करत आहेत. हत्या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.


गणेश काळे याच्यावर हल्लेखोरांनी सहा गोळ्या झाडल्या. त्यानंतर गणेशवर कोयत्याने वार करण्यात आले. गणेशचा मृत्यू झाल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले.


पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले की, गणेशचा भाऊ समीर काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणात सहभागी होता. त्यानेच हत्येसाठी पिस्तुले मध्य प्रदेशमधून आणली होती. समीरसोबत आकाश म्हस्के, संगम वाघमारे आणि आबा खोंड होते. या चौघांनी धुळेमार्गे मध्यप्रदेशमधून पिस्तुले आणल्याची माहिती समोर आली होती.


आयुष कोमकरची आदेंकर टोळीकडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर टोळी प्रमुख सुर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि त्याच्या अनेक साथीदारांना अटक करण्यात आली होती. एवढी कारवाई होऊनही आंदेकर टोळी सक्रिय असल्याचे गणेश काळेच्या हत्येतून दिसून आले आहे. वनराज आंदेकर हत्या प्रकरणी तुरूंगात असणाऱ्या समीर काळेचा गणेश काळे हा भाऊ आहे. त्यामुळे या हत्येमागे टोळीयुद्ध आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत. गेल्यावर्षी वनराज आंदेकरची हत्या कोमकर टोळीकडून करण्यात आली होती. त्यानंतर त्या हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकरची हत्या करण्यात आली.


Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत