महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव वाढला; "काळा दिन" कार्यक्रमासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले!

कोल्हापूर : "काळा दिन"आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात शनिवारी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. बेळगाव आणि सीमाभागात आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवरच थांबवले, ज्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.


कर्नाटक राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचनेनंतर झाली. हा दिवस मराठी भाषिक सीमाभागातील लोक दरवर्षी “काळा दिन” म्हणून पाळतात. बेळगाव, कारवार, निपाणी आणि इतर मराठीबहुल भागांवर कर्नाटकाचे वर्चस्व असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन दरवर्षी केले जाते.


या वर्षीदेखील महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना, युवा समिती आणि महिला आघाडी यांसह अनेक संघटनांनी काळा दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची तयारी केली होती. मात्र या आंदोलनाला जाणाऱ्या कोल्हापुरातील शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवरच थांबवले.


दरम्यान, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या दोन्ही गटांच्या नेत्यांनाही कर्नाटकात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. खासदार धैर्यशील माने, उपनेते संजय पवार, विजय देवणे, सुनील शिंत्रे आणि सुनील मोदी या नेत्यांना सीमाभागात येण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही संजय पवार आणि विजय देवणे यांनी कोगनोळी टोल नाक्यावर पोहोचून आंदोलनात सहभागी होण्याचा प्रयत्न केला.


संजय पवार आणि विजय देवणे यांनी सांगितले की, “कर्नाटक पोलिसांकडून कितीही अडथळे आले तरी आम्ही मराठी माणसांसोबत उभे राहणार. मराठी अस्मितेसाठी लढा सुरूच राहील.”


दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी मराठी भाषक सीमाभागातील बांधवांनी आपले व्यवहार बंद ठेवून काळा दिन पाळला आहे. गेली ६९ वर्षं मराठी माणसं मूक आंदोलन करत मराठी गावांना महाराष्ट्रात सामावून घेण्याची मागणी करत आहेत.


सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, बेळगाव हद्दीत येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.


Comments
Add Comment

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)