महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव वाढला; "काळा दिन" कार्यक्रमासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले!

कोल्हापूर : "काळा दिन"आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात शनिवारी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. बेळगाव आणि सीमाभागात आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवरच थांबवले, ज्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.


कर्नाटक राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचनेनंतर झाली. हा दिवस मराठी भाषिक सीमाभागातील लोक दरवर्षी “काळा दिन” म्हणून पाळतात. बेळगाव, कारवार, निपाणी आणि इतर मराठीबहुल भागांवर कर्नाटकाचे वर्चस्व असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन दरवर्षी केले जाते.


या वर्षीदेखील महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना, युवा समिती आणि महिला आघाडी यांसह अनेक संघटनांनी काळा दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची तयारी केली होती. मात्र या आंदोलनाला जाणाऱ्या कोल्हापुरातील शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवरच थांबवले.


दरम्यान, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या दोन्ही गटांच्या नेत्यांनाही कर्नाटकात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. खासदार धैर्यशील माने, उपनेते संजय पवार, विजय देवणे, सुनील शिंत्रे आणि सुनील मोदी या नेत्यांना सीमाभागात येण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही संजय पवार आणि विजय देवणे यांनी कोगनोळी टोल नाक्यावर पोहोचून आंदोलनात सहभागी होण्याचा प्रयत्न केला.


संजय पवार आणि विजय देवणे यांनी सांगितले की, “कर्नाटक पोलिसांकडून कितीही अडथळे आले तरी आम्ही मराठी माणसांसोबत उभे राहणार. मराठी अस्मितेसाठी लढा सुरूच राहील.”


दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी मराठी भाषक सीमाभागातील बांधवांनी आपले व्यवहार बंद ठेवून काळा दिन पाळला आहे. गेली ६९ वर्षं मराठी माणसं मूक आंदोलन करत मराठी गावांना महाराष्ट्रात सामावून घेण्याची मागणी करत आहेत.


सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, बेळगाव हद्दीत येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.


Comments
Add Comment

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पर्यावरणीय पुनरुज्जीवन

मुंबई : विदर्भातील विविध विकास कामांबरोबरच तेथील जंगल संपदा राखण्यासाठी व त्याच्या वाढीसाठी मुख्यमंत्री

नागपूरमध्ये अतिविशेषोपचार वैद्यकीय अभ्यासक्रमांसह ६१५ खाटांचे रुग्णालय

नागपूर : नागपूर येथे वैद्यकीय उपचाराच्या दर्जेदार सुविधा रुग्णांना उपलब्ध व्हाव्यात आणि वैद्यकीय

शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एसटीची हेल्पलाईन

धाराशिव (प्रतिनिधी) - शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी

Dharashiv Accident : सोलापूर-हैदराबाद महामार्गावर क्रुझरचा भीषण अपघात; धाराशिवमध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू

धाराशिव : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव जिल्ह्यात आज शनिवारी (२२ नोव्हेंबर २०२५) सकाळी एक भीषण

Nashik Ring Road : नाशिककरांना 'ट्रॅफिक जॅम' मधून मुक्ती! ६६ किमी लांबीचा रिंग रोड कसा असेल? ८,००० कोटींचा प्रोजेक्ट पूर्ण आराखडा!

नाशिक : नाशिक शहराचा जसजसा विकास झाला, तसतशी शहरात वाहतूककोंडीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या

Dondaicha Nagar parishad Election : ७३ वर्षांचा इतिहास मोडला! दोंडाईचा नगर परिषद पहिल्यांदाच बिनविरोध; रावल यांनी कोणते 'गुप्त राजकारण' केले?

धुळे : राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी धुळे (Dhule News) जिल्ह्यातील राजकारणात एक नवा