महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव वाढला; "काळा दिन" कार्यक्रमासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले!

कोल्हापूर : "काळा दिन"आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात शनिवारी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. बेळगाव आणि सीमाभागात आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवरच थांबवले, ज्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.


कर्नाटक राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचनेनंतर झाली. हा दिवस मराठी भाषिक सीमाभागातील लोक दरवर्षी “काळा दिन” म्हणून पाळतात. बेळगाव, कारवार, निपाणी आणि इतर मराठीबहुल भागांवर कर्नाटकाचे वर्चस्व असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन दरवर्षी केले जाते.


या वर्षीदेखील महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना, युवा समिती आणि महिला आघाडी यांसह अनेक संघटनांनी काळा दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची तयारी केली होती. मात्र या आंदोलनाला जाणाऱ्या कोल्हापुरातील शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवरच थांबवले.


दरम्यान, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या दोन्ही गटांच्या नेत्यांनाही कर्नाटकात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. खासदार धैर्यशील माने, उपनेते संजय पवार, विजय देवणे, सुनील शिंत्रे आणि सुनील मोदी या नेत्यांना सीमाभागात येण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही संजय पवार आणि विजय देवणे यांनी कोगनोळी टोल नाक्यावर पोहोचून आंदोलनात सहभागी होण्याचा प्रयत्न केला.


संजय पवार आणि विजय देवणे यांनी सांगितले की, “कर्नाटक पोलिसांकडून कितीही अडथळे आले तरी आम्ही मराठी माणसांसोबत उभे राहणार. मराठी अस्मितेसाठी लढा सुरूच राहील.”


दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी मराठी भाषक सीमाभागातील बांधवांनी आपले व्यवहार बंद ठेवून काळा दिन पाळला आहे. गेली ६९ वर्षं मराठी माणसं मूक आंदोलन करत मराठी गावांना महाराष्ट्रात सामावून घेण्याची मागणी करत आहेत.


सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, बेळगाव हद्दीत येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.


Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे