सिक्कीममध्ये हिमवृष्टी! झारखंड आणि उत्तर बंगालमध्ये अतीवृष्टी होण्याची शक्यता, खराब वातावरणामुळे अर्थमंत्र्यांनी रद्द केला भूतान दौरा

सिक्कीम: भारत-चीन सीमेवर झालेल्या मुसळधार हिमवृष्टीमुळे सिक्कीममधील तापमानात मोठी घट झाली आहे. हिमवृष्टीमुळे अनेक भागात पारा शून्याखाली गेला आहे. ज्याचा परिणाम सिक्कीममधील जनजीवनावर झाला असून हवामान खात्याने पुढील २४ तासांत सिक्कीममधील हवामान आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवली आहे. यासाठी सिक्कीममध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.


सिक्कीममध्ये जारी करण्यात आलेल्या रेड अलर्टमध्ये पर्यटकांना उंचावरील भागात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर सीमा रस्ते संघटनेचे पथक बर्फ हटवण्यासाठी सतत काम करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, हा हवामान बदलाचा परिणाम असू शकतो. कारण, अशी हिमवृष्टी सहसा नोव्हेंबरच्या मध्यापासून सुरू होते.


हवामान विभागाने आजपासून पुढील दोन दिवस अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानुसार, तवांग, पश्चिम कामेंग, लोअर सुबानसिरी आणि अंजाव जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लोअर दिबांग व्हॅलीच्या काही भागातही वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.




झारखंडमध्ये सुद्धा पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने १३ जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी केला आहे. तर उत्तर बंगालसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे . चक्रीवादळ मोंथाच्या प्रभावामुळे, पुढील २४ तासांत उत्तर बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितले की अलीपूरद्वार, कूचबिहार, जलपाईगुडी, कालिम्पोंग आणि दार्जिलिंग जिल्ह्यांमध्ये वादळासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो.


खराब हवामानामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा भूतानचा अधिकृत दौरा रद्द करण्यात आला आहे. सीतारमण ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान भारत आणि भूतानमधील आर्थिक संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने भूतानला भेट देणार होत्या. या चार दिवसांच्या दौऱ्यात त्या आर्थिक व्यवहार विभागाच्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार होत्या.

Comments
Add Comment

Uttarakhand Train Accident : ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला! उज्जयनी एक्सप्रेसचे ३ डब्बे रुळावरून घसरले

ऋषिकेश : उत्तराखंडमधील ऋषिकेश (Uttarakhand Train Accident) येथे उज्जयनी एक्सप्रेसशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन

Stray Dog Menace : रस्त्यांवरील कुत्र्यांचा प्रश्न अखेर सुटणार ? नागरिकांची सुरक्षा की प्राण्यांचे हक्क, आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे देशाचे लक्ष

नवी दिल्ली : देशभरातील गल्लीबोळांमध्ये आणि रस्त्यांवर वाढलेली भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांच्याकडून

Petrol Diesel Price Hike : सर्वसामान्यांना पुन्हा झटका! पेट्रोल-डिझेलच्या दरात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे (Petrol Diesel Price Hike) सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा मोठा फटका बसला आहे.

Mumbai-Ahmedabad Bullet Train : प्रतीक्षा संपली! देशातील पहिल्या 'बुलेट ट्रेन'ची पहिली झलक आली समोर; दिल्लीत झळकावले चित्र

नवी दिल्ली : भारतातील बहुचर्चित आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन' (Mumbai-Ahmedabad Bullet Train)

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

Dubare Elephant Camp : थरकाप उडवणारी घटना! कर्नाटकातील दुबारे हत्ती कॅम्पमध्ये दोन हत्तींच्या झुंजीत महिला पर्यटकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या 'दुबारे एलिफंट कॅम्प' (Dubare Elephant Camp) मध्ये एक अत्यंत