डांबरीकरणासाठी शहाड पूल पुन्हा बंद

वाहतूक बंदीमुळे वाहनचालकांना २० दिवस मनस्ताप


उल्हासनगर : कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील शहाड पूल पुन्हा ३ नोव्हेंबरपासून ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत डांबरीकरणासाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने हे काम हाती घेणार असून, या काळात पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. यापूर्वी २८ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यावेळी पुलाची डागडुजी करण्यात आली होती. मात्र पुलावरील परिस्थिती जैसे थे असल्याची वाहनचालकांकडून तक्रार केली जात होती. आता डांबरीकरणाचे काम होणार असल्याने पुन्हा २० दिवस वाहनचालकांसाठी कोंडीचे ठरणार आहेत.


उल्हासनगर वाहतूक उपविभागाच्या हद्दीत येणाऱ्या या कामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने ठाणे वाहतूक विभागाने पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे. वाहतूक पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायद्यानुसार याबाबतची अधिसूचना जारी करून वाहनचालकांना माहिती दिली आहे.


प्रवेश बंद आणि पर्यायी मार्ग कसे असतील याबाबत वाहतूक पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. यात अहिल्यानगरकडून माळशेजमार्गे कल्याणकडे येणाऱ्या वाहनांना मुरबाडच्या वेशीवर बारवी डॅम फाटा येथे प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग हा बारवी धरण रस्ता - बदलापूर रस्ता - बदलापूर - पालेगाव - नेवाळी नाका - मंलग रस्ता - लोढा पलावा/शिळ-डायघर रस्ता - पत्रीपूल - कल्याण मार्गे पुढे जातील.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये