क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिलांसाठी सात वेगवेगळे नियम

मुंबई : भारतीय पुरुष क्रिकेट संघ (Indian cricket team) सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत व्यस्त आहे. तर दुसरीकडे भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian cricket women’s team) २०२५ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये धमाल करत आहे. भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता २ नोव्हेंबरला होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. दोन्ही संघ पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.


पण तुम्हाला माहीत आहे का ? पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये ७ महत्त्वाचे नियम वेगळे असतात! चला, जाणून घेऊया या दोन्ही खेळांतील काही प्रमुख फरक


पुरुष क्रिकेटमध्ये कसोटी सामना ५ दिवसांचा असतो, तर महिलांसाठी कसोटी सामना ४ दिवसांचा असतो.


पुरुष कसोटी सामन्यात दररोज किमान ९० षटकांचा खेळ होतो, तर महिला कसोटीमध्ये दररोज किमान १०० षटके टाकणे बंधनकारक असते.


वनडे क्रिकेटमध्येही फरक आहे. पुरुषांच्या सामन्यात तीन ‘पॉवरप्ले’ असतात, तर महिला सामन्यात फक्त एकच ‘पॉवरप्ले’ दिला जातो.


पुरुषांच्या वनडे सामन्यात बाउंड्रीचे अंतर किमान ५९.४३ मीटर आणि जास्तीत जास्त ८२ मीटर असते. महिला सामन्यात हे अंतर किमान ५४.८६ मीटर आणि जास्तीत जास्त ६४ मीटर असते.


दोघांच्या ‘इन-सर्कल’च्या अंतरातही फरक आहे. पुरुष सामन्यात ३० मीटर तर महिला सामन्यात २५ मीटरचे अंतर असते.


चेंडूच्या वजनातही बदल असतो. महिला क्रिकेटमधील चेंडूचे वजन किमान १४२ ग्रॅम असते, तर पुरुष क्रिकेटमध्ये तो किमान १५६ ग्रॅमचा असतो.

Comments
Add Comment

ICC Women's World Cup 2025 : महिला वर्ल्ड कप २०२५ च्या विजेत्या-उपविजेत्या संघाला किती रक्कम मिळणार? पराभूत संघावरही होणार 'कोट्यवधींचा वर्षाव'! आकडेवारी पहाच...

नवी मुंबई : महिला विश्वचषक २०२५ (ICC Women's World Cup 2025) चा अंतिम सामना रविवार, २ नोव्हेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन

ICC Womens World Cup Final : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तुफान झुंज; फायनल कधी, कुठे, किती वाजता? 'या' ॲपवर मोफत पाहा!

नवी मुंबई : हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये ऐतिहासिक

जोश हेझलवूडची एमसीजीवर 'ड्रीम स्पेल'!

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मेलबर्न क्रिकेट

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने