पेटीएमने एनआरआयसाठी UPI पेमेंट्सची सुविधा सुरू केली

आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांकावरून भारतात सुलभ व्यवहार शक्य


मुंबई: पेटीएम (One 97 Communications Ltd.) या भारतातील अग्रगण्य मर्चंट पेमेंट्स आणि फिनटेक सेवा कंपनीने जाहीर केले आहे की,'यापुढे देशांतील एनआरआय (Non Residence Indian NRI) आता त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रमांकासह पेटीएम अँपवर लॉगिन करून NRE किंवा NRO खात्यांद्वारे सहज युपीआय (UPI) पेमेंट्स करू शकतील.


या सुविधेमुळे एनआरआय वापरकर्ते आता भारतातील दुकाने, रेस्टॉरंट्स, व्यापारी, तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकतात. त्यांना आता आंतरराष्ट्रीय पेमेंट गेटवे किंवा चलन रूपांतरणाची गरज नाही. ते त्यांच्या खात्यांदरम्यान पैसे ट्रान्सफर करू शकतात किंवा कोणत्याही UPI ID किंवा UPI लिंक्ड मोबाइल नंबर वर त्वरित पैसे पाठवू शकतात. ही सेवा एनपीसीआय (National Payments Corporation of India NPCI) च्या साहाय्याने सुरू करण्यात आली असून ती सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाँगकाँग, ओमान, कतार, अमेरिका, सौदी अरेबिया, यूएई, यूके, फ्रान्स आणि मलेशिया येथील भारतीयांसाठी उपलब्ध आहे असे पेटीएमने आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.


याविषयी बोलताना पेटीएम प्रवक्त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे की,' भारतासाठी, भारतात तयार केलेल्या तंत्रज्ञानाने प्रत्येक भारतीयाला जोडण्याचे आमचे स्वप्न आहे. आता एनआरआयंना त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून पेटीएम UPI वापरण्याची परवानगी देणे ही त्या प्रवासातील पुढची पायरी आहे.'


एनआरआयंसाठी भारतात पेटीएमवर UPI सुरू करण्याची प्रक्रिया कशी असेल?


पेटीएम अँप डाउनलोड करा आणि उघडा


आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांकाने लॉगिन करा


SMSद्वारे क्रमांक पडताळा करा आणि बँक खाते लिंक करून पेमेंट सुरू करा

Comments
Add Comment

सामान्य प्रशासन विभागाकडून तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यात ए. शैला, डॉ.

धाराशिवमध्ये हिट अँड रन, ऊसतोड मजुरांना उडवले

धाराशिव : धाराशिवमधील कळंब लातूर रस्त्यावर हिट हिट अँड रनची घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या कारने ऊसतोड

काँग्रेस-वंचितच्या संभाव्य आघाडीने वाढवले ठाकरे बंधूंचे टेन्शन

मुंबई पालिकेसाठी आंबेडकरांना प्रस्ताव; मुस्लिम आणि दलित मतांचे विभाजन झाल्यास उबाठाचे पानिपत अटळ मुंबई : मुंबई

Devendra Fadanvis : पाच वर्षांनंतरही राज्यात महायुतीच दिसणार; मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास

गोंदिया : राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध राजकीय चर्चा आणि अफवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

बांगलादेशमध्ये उस्मान हादी पाठोपाठ मोहम्मद मोतालेब शिकदारची हत्या

ढाका : बांगलादेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील हंगामी

उड्डाणानंतर दिल्ली - मुंबई विमानात बिघाड, इंजिन हवेतच पडलं बंद

नवी दिल्ली : दिल्लीहून मुंबईकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाणानंतर अवघ्या ४० मिनिटांत तांत्रिक