Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बरसणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 'मोंथा' चक्रीवादळ (Montha Cyclon) आता निवळले आहे. परिणामी, छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या हवामानातील बदलामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.



'तुळशीचं लग्न' झाल्याशिवाय पाऊस पाठ सोडणार नाही, मराठवाड्यात गडगडाटी वादळाची शक्यता


यंदाची नवरात्र आणि दिवाळी देखील पावसाने गाजवली. त्यामुळे, आता 'तुळशीचं लग्न' झाल्याशिवाय पाऊस एग्झिट घेणार नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी आणि संपूर्ण नोव्हेंबर महिन्यासाठीचा अंदाज (Forecast) वर्तवला आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या, २ नोव्हेंबरला, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका पावसासह गडगडाटी वादळ (Thunderstorm) होण्याची शक्यता आहे. याशिवाय, कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, नोव्हेंबर महिन्यात देशभरात पाऊस सरासरीपेक्षा जास्त (Above Average) राहण्याची शक्यता आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातही नोव्हेंबर महिन्यात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.



शनिवार, १ नोव्हेंबरनंतर मुंबईत कोरडे वातावरण अपेक्षित...


गेल्या काही दिवसांपासून मुंबईत (Mumbai) पाऊस सुरू होता. या पावसामुळे दिवाळीच्या काळातही वातावरणात गारवा जाणवत होता, तसेच प्रदूषणाची पातळी देखील कमी झाली होती. मात्र, आता हवामान विभागाने महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. शनिवार, १ नोव्हेंबर नंतर मुंबईतील हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, पुढील काही दिवसांत मुंबईकरांना पावसापासून सुटका मिळणार असून, दिवसाच्या तापमानात आणि आर्द्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या