महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई

पंजाब : शस्त्र तस्करी प्रकरणात आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी सिकंदरचे संबंध असल्याचे तपासात समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पंजाब पोलिसांनी सांगितले आहे.



सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रहिवासी असलेला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याच्यासह चौघांना सीआयए पथकाने शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाबच्या मोहाली येथून अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी आरोपींकडून १.९९ लाख रुपयांची रोकड, पाच पिस्तुले, काडतुसे, दोन एसयूव्ही गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पंजाबच्या खरड पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



हरियाणा आणि राजस्थानातील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचा थेट संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. याच टोळीतील दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे २४ ऑक्टोबर रोजी एसयूव्ही गाडीतून दोन शस्त्रे घेऊन मोहालीत आले होते. ही शस्त्रे सिकंदर शेखकडे देण्याचे ठरले होते. संबंधित शस्त्रे कृष्ण ऊर्फ हॅप्पीकडे पुरवण्याची जबाबदारी सिकंदर शेखवर होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.




सिकंदरने २०२४ सालचा महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला होता. तसेच आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असल्यामुळे त्याला क्रीडा कोट्यातून लष्करात भरतीही करुन घेण्यात आले होते. मात्र लष्करातील नोकरी सोडून गेल्या काही महिन्यांपासून तो तस्करी करत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट होत आहे. यासाठी तो पंजाबमध्येच वास्तव्यास होता.

Comments
Add Comment

कोट्यावधींच्या सायबर फसवणुकीचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश; गुन्हेगारीचे मुळ उद्ध्वस्त करणाच्या हेतूने कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांनी गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीविरोधात मोहीम राबवत शेकडो फसवणूक

लॉजिस्टिक्स आणि स्थानिक वितरण सेवांवर जीएसटी आकारणीतील स्पष्टतेसाठी फर्स्ट इंडियाचे अर्थ मंत्रालयाला आवाहन

मुंबई: भारतातील ई-कॉमर्स आणि रिटेल लॉजिस्टिक्स क्षेत्राला वाहतूक सेवांबाबतच्या अलीकडील जीएसटी सुधारणांमुळे

भारतात नवीन कामगार कायदे लागू, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल! काय होणार लाभ, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी देशात चार नवीन कामगार कायदे लागू करत असल्याची मोठी घोषणा

निवडणुकीपूर्वीच भाजपने उधळला विजयाचा गुलाल! २४६ नगरपरिषदांपैकी १०० जागांवर बिनविरोध कमळ फुलले

मुंबई: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या पहिल्या

चालकाला हृदयविकाराचा झटका आणि अंबरनाथमध्ये घडला थरकाप उडवणारा अपघात!

ठाणे: मुंबई नजीकच्या अंबरनाथ शहरात काल (२१ नोव्हेंबर) संध्याकाळी अपघाताची मोठी दुर्घटना घडली. अंबरनाथ शहरातील

राज्यभर ईएसआयसी रुग्णालयांसाठी सरकारी जमिनी 'विनामूल्य'!

मुंबई : राज्यात उभारल्या जाणाऱ्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) रुग्णालयांसाठी सरकारी जमीन 'महसूल मुक्त'