Rajyasabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; ३७ जागांसाठी १६ मार्चला होणार निवडणूक

राज्यसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे. येत्या १६ मार्च रोजी ही निवडणूक लढवली जाणार आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.


राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. एप्रिल २०२६ मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे. देशभरातील विविध राज्यांतील जागांसाठी मतदान होणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील ७ जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेत महायुतिचे ६ तर महाविकास आघाडीचा १ उमेदवार राज्यसभेवर निवडला जाऊ शकतो.



कुणाचे किती संख्याबळ?


भाजप - १३१


शिवसेना - ५७


राष्ट्रवादी (अजित पवार) - ४०


उबाठा - २०


काँग्रेस - १६


राष्ट्रवादी (शरद पवार) - १०


अपक्ष आणि इतर - १२


उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे विधानसभेतील २ जागा रिक्त आहेत.



मतांचे गणित कसे असेल?


राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीच्या ३७ मतांची गरज आहे. पक्षीय बलानुसार भाजपचे ४, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रत्येकी १, महविकास आघाडीचा १ उमेदवार निवडून जाऊ शकतो.


महाराष्ट्रातून एनडीएचे निवडणूक कार्यक्रम:


अधिसूचना : २६ फेब्रुवारी


उमेदवारी अर्ज अंतिम मुदत : ५ मार्च


उमेदवारी अर्जाची छाननी : ६ मार्च


अर्ज माघारीची मुदत : ९ मार्च


मतदान : १६ मार्च (स. ९ ते संध्या. ४)


मतमोजणी : १६ मार्च (संध्या. ५ पासून) 

Comments
Add Comment

Gel Nail Polish Side Effects : युरोप, ब्रिटनमध्ये बंदी असलेला 'हा' धोकादायक केमिकल भारतीय जेल नेलपॉलिशमध्ये अद्याप सुरूच! जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : नेल आर्ट (Nail Art) आणि जेल मॅनिक्युअरचा (gel manicure Trend) ट्रेंड सध्या जगभरात आणि भारतातही मोठ्या प्रमाणावर वाढला

Malad Bank Theft : बँक फोडली, पण कॅश लॉकरपर्यंत पोहोचण्याआधीच पकडला; मालाडमध्ये २४ तासांत आरोपीला बेड्या

मुंबई : मालाडच्या एव्हरशाईन नगर परिसरातील एका बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली असून, बांगूर

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व

Navnath Ban : संजय राऊत - राहुल गांधींच्या भेटीवरून भाजप आक्रमक; ‘उबाठा संपवण्याची सुपारी’ घेतल्याचा आरोप

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची घेतलेल्या

Azad Maidan Protest : आझाद मैदान वगळता मुंबईत सर्व ठिकाणी आंदोलनास बंदी

- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या