Rajyasabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; ३७ जागांसाठी १६ मार्चला होणार निवडणूक

राज्यसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे. येत्या १६ मार्च रोजी ही निवडणूक लढवली जाणार आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.


राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. एप्रिल २०२६ मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे. देशभरातील विविध राज्यांतील जागांसाठी मतदान होणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील ७ जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेत महायुतिचे ६ तर महाविकास आघाडीचा १ उमेदवार राज्यसभेवर निवडला जाऊ शकतो.



कुणाचे किती संख्याबळ?


भाजप - १३१


शिवसेना - ५७


राष्ट्रवादी (अजित पवार) - ४०


उबाठा - २०


काँग्रेस - १६


राष्ट्रवादी (शरद पवार) - १०


अपक्ष आणि इतर - १२


उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे विधानसभेतील २ जागा रिक्त आहेत.



मतांचे गणित कसे असेल?


राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीच्या ३७ मतांची गरज आहे. पक्षीय बलानुसार भाजपचे ४, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रत्येकी १, महविकास आघाडीचा १ उमेदवार निवडून जाऊ शकतो.


महाराष्ट्रातून एनडीएचे निवडणूक कार्यक्रम:


अधिसूचना : २६ फेब्रुवारी


उमेदवारी अर्ज अंतिम मुदत : ५ मार्च


उमेदवारी अर्जाची छाननी : ६ मार्च


अर्ज माघारीची मुदत : ९ मार्च


मतदान : १६ मार्च (स. ९ ते संध्या. ४)


मतमोजणी : १६ मार्च (संध्या. ५ पासून) 

Comments
Add Comment

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात

Indian History : सापडले दोन हजार वर्षे जुने तीन किलो वजनाचे प्राचीन ताम्रपत्र

बिलासपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर येथील मल्हार परिसरातील रहिवासी संजीव पांडेय यांच्या ताब्यातून सुमारे २०००

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

Iran - America War : होर्मुझ मधून बारूदी सुरुंग काढायला लागू शकतात सहा महिने - अमेरिका

पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान इराणने होर्मुज सामुद्रधुनीत बारूदी सुरुंगांची पेरणी करून हा मार्ग अत्यंत

White House Dinner Firing : वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमधील गोळीबाराने खळबळ; मोदींसह जगभरातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया

वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये कॉरेस्पॉन्डेंट्स डिनर दरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेने जग हादरले आहे.