राजस्थानमध्ये पाच दहशतवाद्यांना अटक, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

राजस्थान: राजस्थान दहशतवाद विरोधी पथकाने जोधपूर, बारमेर आणि करौलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकून पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने घटनास्थळावरून मोबाईल फोन आणि दहशतवादी साहित्य जप्त केले असून जयपूरमधील एटीएस मुख्यालयात आरोपींची चौकशी सुरू आहे. ही कारवाई शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.


कारवाई गुप्तचरांनी दिलेल्या माहितीवर आधारित होती. एटीएस पथक गेल्या काही दिवसांपासून अनेक व्यक्तींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होते. ज्यामुळे ही मोठी कारवाई करण्यात यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. खबरदारीचे उपाय करण्यात आले आहेत.




पोलिस महानिरीक्षक विकास कुमार म्हणाले की, अटक केलेल्या आरोपींमध्ये बाडमेरचा रहिवासी उस्मान उमर, जोधपूरचा रहिवासी मसूद, करौलीचा रहिवासी मोहम्मद अयुब, बाडमेरचा रहिवासी मोहम्मद जुनैद आणि बसीर यांचा समावेश आहे. या सर्वांना अधिक चौकशीसाठी जयपूर येथील एटीएस मुख्यालयात नेण्यात आले आहे.

Comments
Add Comment

शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील या जिल्ह्यांतून जाणार

मुंबई : एमएसआरडीसीने ८५६ किमीच्या महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार असलेल्या शक्तिपीठ

कर्तव्यपथावर 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर, प्रजासत्ताक दिनी दिसले देशाचे सामर्थ्य

नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर संचलनाचे अर्थात

प्रजासत्ताक दिनी धाराशिवमध्ये पोलिसाचा मृत्यू

धाराशिव : प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन केल्यानंतर थोड्याच वेळात ५५ वर्षीय मोहन भीमा जाधव या पोलीस अधिकाऱ्याचा

मोदी सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा

नवी दिल्ली : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा

फिलिपाईन्समध्ये बोट बुडून अनेकांचा मृत्यू

झांबोआंगा : फिलिपाईन्समध्ये झांबोआंगा येथून सुलू प्रांतातील जोलो बेटाच्या दिशेने निघालेली बोट समुद्रात

मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे निधन

मुंबई : लोकप्रिय मराठी रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं आहे. प्रथमेशच्या निधनाचे