राजस्थानमध्ये पाच दहशतवाद्यांना अटक, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

राजस्थान: राजस्थान दहशतवाद विरोधी पथकाने जोधपूर, बारमेर आणि करौलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकून पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने घटनास्थळावरून मोबाईल फोन आणि दहशतवादी साहित्य जप्त केले असून जयपूरमधील एटीएस मुख्यालयात आरोपींची चौकशी सुरू आहे. ही कारवाई शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.


कारवाई गुप्तचरांनी दिलेल्या माहितीवर आधारित होती. एटीएस पथक गेल्या काही दिवसांपासून अनेक व्यक्तींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होते. ज्यामुळे ही मोठी कारवाई करण्यात यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. खबरदारीचे उपाय करण्यात आले आहेत.




पोलिस महानिरीक्षक विकास कुमार म्हणाले की, अटक केलेल्या आरोपींमध्ये बाडमेरचा रहिवासी उस्मान उमर, जोधपूरचा रहिवासी मसूद, करौलीचा रहिवासी मोहम्मद अयुब, बाडमेरचा रहिवासी मोहम्मद जुनैद आणि बसीर यांचा समावेश आहे. या सर्वांना अधिक चौकशीसाठी जयपूर येथील एटीएस मुख्यालयात नेण्यात आले आहे.

Comments
Add Comment

लॉजिस्टिक्स आणि स्थानिक वितरण सेवांवर जीएसटी आकारणीतील स्पष्टतेसाठी फर्स्ट इंडियाचे अर्थ मंत्रालयाला आवाहन

मुंबई: भारतातील ई-कॉमर्स आणि रिटेल लॉजिस्टिक्स क्षेत्राला वाहतूक सेवांबाबतच्या अलीकडील जीएसटी सुधारणांमुळे

भारतात नवीन कामगार कायदे लागू, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल! काय होणार लाभ, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी देशात चार नवीन कामगार कायदे लागू करत असल्याची मोठी घोषणा

निवडणुकीपूर्वीच भाजपने उधळला विजयाचा गुलाल! २४६ नगरपरिषदांपैकी १०० जागांवर बिनविरोध कमळ फुलले

मुंबई: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या पहिल्या

चालकाला हृदयविकाराचा झटका आणि अंबरनाथमध्ये घडला थरकाप उडवणारा अपघात!

ठाणे: मुंबई नजीकच्या अंबरनाथ शहरात काल (२१ नोव्हेंबर) संध्याकाळी अपघाताची मोठी दुर्घटना घडली. अंबरनाथ शहरातील

राज्यभर ईएसआयसी रुग्णालयांसाठी सरकारी जमिनी 'विनामूल्य'!

मुंबई : राज्यात उभारल्या जाणाऱ्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) रुग्णालयांसाठी सरकारी जमीन 'महसूल मुक्त'

दुबईत एअर शो दरम्यान LCA तेजस विमान कोसळले, विंग कमांडर नमांश स्यालचा मृत्यू

दुबई : दुबई एअर शो दरम्यान शुक्रवार २१ नोव्हेंबर २०२५ रोजी भारताचे एलसीए तेजस विमान कोसळले. या अपघातात विंग