राजस्थानमध्ये पाच दहशतवाद्यांना अटक, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

राजस्थान: राजस्थान दहशतवाद विरोधी पथकाने जोधपूर, बारमेर आणि करौलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकून पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने घटनास्थळावरून मोबाईल फोन आणि दहशतवादी साहित्य जप्त केले असून जयपूरमधील एटीएस मुख्यालयात आरोपींची चौकशी सुरू आहे. ही कारवाई शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.


कारवाई गुप्तचरांनी दिलेल्या माहितीवर आधारित होती. एटीएस पथक गेल्या काही दिवसांपासून अनेक व्यक्तींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होते. ज्यामुळे ही मोठी कारवाई करण्यात यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. खबरदारीचे उपाय करण्यात आले आहेत.




पोलिस महानिरीक्षक विकास कुमार म्हणाले की, अटक केलेल्या आरोपींमध्ये बाडमेरचा रहिवासी उस्मान उमर, जोधपूरचा रहिवासी मसूद, करौलीचा रहिवासी मोहम्मद अयुब, बाडमेरचा रहिवासी मोहम्मद जुनैद आणि बसीर यांचा समावेश आहे. या सर्वांना अधिक चौकशीसाठी जयपूर येथील एटीएस मुख्यालयात नेण्यात आले आहे.

Comments
Add Comment

शनिवार विशेष एक्सप्लेनर-अ‍ॅक्टिव्ह व पॅसिव्ह फंड गुंतवणूकीत नेमका फरक काय? तुम्हाला कुठला सोयीस्कर? हि प्रश्न पडलाय? मग वाचा

मोहित सोमण म्युच्युअल फंड गुंतवणुक करताना अ‍ॅक्टिव्ह फंडात करू का पॅसिव्ह फंडात करू अशी द्विधा मनस्थिती तुमची

मुंबईत अल्पवयीन मुलीवर गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार, आरोपीला ६ तासांत अटक

मालाड : मुंबईत अल्पवयीन मुलीवर गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

India T20 World Cup Squad Announcement : वर्ल्ड कप २०२६ साठी टीम इंडिया सज्ज! BCCIची आज महत्त्वाची बैठक; कोणाला मिळणार संधी अन् कोणाचा पत्ता कट?

मुंबई : आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी संपूर्ण क्रिकेट विश्व ज्याची वाट पाहत आहे, त्या भारतीय संघाची घोषणा

ईडीकडून किंगफिशरवर कारवाई तेजीत, कर्मचाऱ्यांना थकलेले वेतन देण्यासाठी ईडीचा पुढाकार

मुंबई: किंगफिशर एअरलाईन्सचे सर्वेसर्वा असलेल्या उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याविरोधात अमंलबजावणी संचालनालय

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १७ वर्षांची जेल; भ्रष्टाचार प्रकरणात पत्नी बुशरा बीबीलाही मोठी शिक्षा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना भ्रष्टाचाराच्या एका मोठ्या

Rajdhani Express Accident : आसाममध्ये काळजाचा थरकाप! राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, ८ हत्तीचं जागीच दुर्दैवी मृत्यू

आसाममधील जमुनामुख जवळील सानरोजा भागात शुक्रवारी मध्यरात्री एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी रेल्वे अपघात झाला.