दहावी-बारावी परिक्षा वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीत होणार परिक्षा

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रायोगिक परीक्षा जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये घेतल्या जातील. अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ आहे.


बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होऊन १८ मार्चपर्यंत चालणार आहे. दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होऊन १८ मार्च २०२६ रोजी संपणार आहे. बारावीच्या प्रायोगिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यांकन परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहेत. या काळात विज्ञान शाखेच्या प्रायोगिक परीक्षा, वाणिज्य शाखेतील प्रोजेक्ट मूल्यांकन आणि कला शाखेतील तोंडी परीक्षा पूर्ण करण्यात येतील. दहावीच्या प्रायोगिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यांकन परीक्षा २ फेब्रुवारी ते बुधवार, १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडतील.


या दरम्यान शारीरिक शिक्षण, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र अंतर्गत आणि कला विषयांच्या मूल्यांकन परीक्षा शाळास्तरावर घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी त्यानुसार तयारी करून वेळेचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विषयवार वेळापत्रक आणि सूचना मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर पाहता येतील, अशी माहिती मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी दिली.


अतिविलंब शुल्कासह अंतिम मुदत जाहीर


शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी नोंदणी अर्ज क्रमांक १७ सादर करण्यासंदर्भात महत्त्वाची सूचना जाहीर केली आहे. अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याचा कालावधी १ नोव्हेंबर २०२५ ते ३१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आहे. अतिविलंब शुल्क म्हणून प्रति विद्यार्थी प्रति दिवस २० रुपये आकारण्यात येणार आहे. या कालावधीनंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीनेच करावी लागेल. यासाठी www.mahahsscboard.in या वेबसाइटवर आवश्यक सर्व सूचना, माहितीपत्रक आणि मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध आहे.

Comments
Add Comment

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील