उबाठाच्या त्या माजी ज्येष्ठ नगरसेवकांना बसावे लागणार घरी

मुंबई (खास प्रतिनिधी) : आगामी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत उबाठाने आता तरुणांना आणि नवीन चेहऱ्यांनाच अधिक प्राधान्य देण्याचा निर्धार केला आहे. उबाठाचे अनेक माजी नगरसेवक हे शिवसेनेत जात असल्याने आता उबाठाचा आपल्याच माजी नगरसेवकांवर विश्वास नाही. त्यामुळे उबाठाची नवीन फळी निर्माण करण्यासाठी विद्यमान जुन्या माजी नगरसेवकांना पुन्हा संधी देण्यात येणार नसून यामध्ये वयाची पन्नाशी पार केलेल्यांचा पत्ता कापला जाणार आहे. यामध्ये माजी महापौर श्रध्दा जाधव, किशोरी पेडणेकर यांच्यासह शुभदा गुडेकर, सदा परब, दीपमाला बढे, विठ्ठल लोकरे, अनिल पाटणकर, चित्रा सांगळे, मिलिंद वैद्य, आशिष चेंबूरकर, सिंधु मसुरकर, अरुंधती दुधवडकर आदी माजी नगरसेवकांचे पत्ते कापले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबरोबरच नगरसेवक बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या पक्षाच्या शाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख आणि विभाग प्रमुख यांच्याही ह्दयात आता धाकधुक वाढली गेली आहे.


मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठाने आपल्या पक्षात मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. 'उबाठा' शिवसेना आता महापालिकेच्या निवडणुकीत नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत आहे. पक्षाला अधिक गतीमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो,असे पक्षाने स्पष्ट केले. ज्यामध्ये ५०-५५ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या आणि प्रदीर्घ काळ नगरसेवकपद भूषवलेल्या अनेक विद्यमान माजी नगरसेवकांना यंदा तिकीट नाकारले जाण्याची शक्यता आहे. तरुण आणि तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून महापालिकेत अधिक प्रभावी कामगिरी करण्याचा पक्षाचा मानस आहे. त्यामुळे उबाठाकडून आता कार्यक्षमता, सार्वजनिक प्रतिमा आणि निवडून येण्याची क्षमता या निकषांवरच विद्यमान माजी नगरसेवक तसेच सक्रिय पदाधिकारी यांचे पुनर्मूल्यांकन केले जात आहे. ज्यांच्यावर जनतेचा रोष आहे किंवा ज्यांनी प्रदीर्घ काळ सत्ता उपभोगली आहे, अशा ज्येष्ठांचा पत्ता कापला जाऊ शकतो.


हा निर्णय केवळ वयाच्या निकषावर आधारित नसून, परफॉर्मन्स आणि जनतेमधील लोकप्रियता यावर आधारीत असून केवळ ज्येष्ठ माजी नगरसेवकांसोबतच इच्छुक पदाधिकाऱ्यांचेही राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे सन २०१७ मध्ये निवडून आलेल्या आणि जात पडताळणीमध्ये निवडून आलेल्या एकूण १०२ नगरसेवकांपैंकी आतापर्यंत एकनाथ शिंदे मुख्य नेता असलेल्या शिवसेनेत ५३ माजी नगसेवक गेलेे आहेत. त्यामुळे आता उबाठाकडे केवळ ४९ माजी नगरसेवक उरले आहेत. त्या उरलेल्या माजी नगरसेवकांपैंकी वयाची पन्नाशी पार केलेले अनेक माजी नगरसेवक आहेत.

Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे