अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी म्हणून यावर मुंबई महापालिकेने एक उपाय शोधून काढलाय. पावसाळ्यात दरवर्षी मुंबई मधील अंधेरीतील सबवे जलमय होतो आणि वाहतूक विस्कळीत होते यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.


अंधेरी सबवेला लागूनच मोगरा नाला वाहतो. उगम स्थळापासून ते सुमारे अडीच किलोमीटर अंतरात हा नाला वाहतो. विशेष म्हणजे या नाल्याचा प्रवाह उगम स्थळापासून अंधेरी साबवयकडे येताना तब्ब्ल १३ किलोमीटरचा उतार आहे. यामुळे नाल्यातील पाणी वेगाने वाहते. पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढली की मोगरा नाल्यातून पाणी वेगाने वाहू लागते. यामुळे अंधेरीतला सगळा सखल भाग पाण्याखाली जातो. अंधेरी सबवे, दाऊद बाग, आझाद नगर या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते.


पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा मार्ग


पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणारा अंधेरी सबवे अंधेरी स्थानकाच्या जवळ आहे. गोखले पुलालगतचा हा मार्ग रेल्वे रूळाच्या खालून जातो.


अंधेरी सबवेवरूनच उड्डाणपूल


एकीकडे अंधेरी सबवे जलमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच, अंधेरी सबवेवरूनच उड्डाणपूल उभारणी करण्याचा पर्याय महापालिका पूल विभागाने निवडला आहे. वॉर्ड स्तरावरही याचे नियोजन करण्यात येणार आहे . सबवेवरून पूल होऊ शकतो का, त्याची लांबी किती असावी, त्याचे बांधकाम करताना येणाऱ्या अडचणी, खर्च, पुलाचा फायदा, रेल्वे प्रशासनासह विविध परवानगी याचा अहवाल तयार केला जाणार आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यावर चर्चा सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.