अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी म्हणून यावर मुंबई महापालिकेने एक उपाय शोधून काढलाय. पावसाळ्यात दरवर्षी मुंबई मधील अंधेरीतील सबवे जलमय होतो आणि वाहतूक विस्कळीत होते यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.


अंधेरी सबवेला लागूनच मोगरा नाला वाहतो. उगम स्थळापासून ते सुमारे अडीच किलोमीटर अंतरात हा नाला वाहतो. विशेष म्हणजे या नाल्याचा प्रवाह उगम स्थळापासून अंधेरी साबवयकडे येताना तब्ब्ल १३ किलोमीटरचा उतार आहे. यामुळे नाल्यातील पाणी वेगाने वाहते. पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढली की मोगरा नाल्यातून पाणी वेगाने वाहू लागते. यामुळे अंधेरीतला सगळा सखल भाग पाण्याखाली जातो. अंधेरी सबवे, दाऊद बाग, आझाद नगर या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते.


पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा मार्ग


पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणारा अंधेरी सबवे अंधेरी स्थानकाच्या जवळ आहे. गोखले पुलालगतचा हा मार्ग रेल्वे रूळाच्या खालून जातो.


अंधेरी सबवेवरूनच उड्डाणपूल


एकीकडे अंधेरी सबवे जलमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच, अंधेरी सबवेवरूनच उड्डाणपूल उभारणी करण्याचा पर्याय महापालिका पूल विभागाने निवडला आहे. वॉर्ड स्तरावरही याचे नियोजन करण्यात येणार आहे . सबवेवरून पूल होऊ शकतो का, त्याची लांबी किती असावी, त्याचे बांधकाम करताना येणाऱ्या अडचणी, खर्च, पुलाचा फायदा, रेल्वे प्रशासनासह विविध परवानगी याचा अहवाल तयार केला जाणार आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यावर चर्चा सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील