अनेक अपयशांनंतर MPSC मध्ये सिन्नरचा रवींद्र भाबड राज्यात तिसरा

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेचा 2024 चा निकाल गुरुवारी रात्री जाहीर झाला. सोलापूरच्या विजय घोरपडे यांनी राज्यात प्रथम, हिमालय घोरपडेने द्वितीय, तर नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचा रवींद्र भाबड यांनी तृतीय क्रमांक पटकावला. लहानशा गावातून सुरुवात करून, अनेक अपयशांवर मात करत त्यांनी हे यश मिळवले आहे.


लहान गावातून मोठं स्वप्न


रवींद्र भाबड यांचे प्राथमिक शिक्षण सिन्नर येथील मोडी गावात झाले , तर माध्यमिक शिक्षण भोजापूर खुरे हायस्कूलमध्ये झाले. उच्च शिक्षण डी कॉलेजमध्ये घेतल्यानंतर त्यांनी कला शाखेतून स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचा निर्णय घेतला. शिक्षणासाठी घरची आर्थिक अडचण असताना पार्ट टाइम काम, मित्रांची मदत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी वाटचाल केली. भाबड म्हणतात, “यशस्वी होण्यासाठी परिस्थिती बदलायची नसते, दृष्टिकोन बदलायचा असतो.” हाच त्यांचा ८ शब्दांचा सक्सेस मंत्र ठरला.


दहा गुणांनी पोलीस भरती हुकली


“मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलो आहे. आई-वडिलांनी मोलमजुरी करून आमचं शिक्षण पूर्ण केलं. 2014 मध्ये पोलीस भरतीत मी दहा गुणांनी अपयशी ठरलो. तेव्हा पोलिसात भरती होणं सोपं होतं, पण मी जाणीवपूर्वक एमपीएससीची कठीण वाट निवडली,” असं भाबड यांनी सांगितलं.


पुणे गाठलं


2015 मध्ये त्यांनी नाशिकमध्ये तयारी सुरू केली आणि नंतर पुण्यात स्थायिक झाले. “सर्व परीक्षांची तयारी करणं ही मोठी चूक ठरते. एका लक्ष्यावर लक्ष केंद्रित केल्याशिवाय यश मिळत नाही,” असा अनुभव ते शेअर करतात.


पहिल्या काही प्रयत्नांत अपयश आलं, पण त्यांनी हार मानली नाही. प्रत्येक वेळी स्वतःचे विश्लेषण करून सुधारणा केल्याचं ते सांगतात “अपयश म्हणजे शेवट नाही, ती पुढच्या प्रयत्नाची सुरुवात असते.”


“माझी गरीब परिस्थितीच माझं बळ”


रवींद्र भाबड यांचं म्हणणं आहे, “गरिबी ही शाप नाही, ती शिक्षकासारखी असते वास्तव शिकवते.” तरुणांना संदेश देताना त्यांनी सांगितलं “सातत्य ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि अडचणींना मित्र बनवा.”


रवींद्र भाबड यांची कहाणी सांगते — परिस्थिती कितीही कठीण असो, जर दृष्टिकोन सकारात्मक असेल, तर यश नक्कीच मिळतं.

Comments
Add Comment

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी