भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सेमी फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कोणाला मिळणार ? जाणून घ्या नियम

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ ची दुसरी सेमी फायनल आज नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. लीग टप्प्यात भारताचा शेवटचा सामनाही याच मैदानावर होता जो पावसामुळे रद्द झाला होता. जर आजची सेमी फायनलची मॅच पावसामुळे रद्द झालंली तर फायनलमध्ये कोणत्या संघाला एन्ट्री मिळणार जाणून घेण्यासाठी आधी नियम समजून घेऊ.


मोंथा चक्रीवादळचा तडाखा हा भारताच्या पूर्व किनापट्टीवर पाहायला मिळतोय आणि त्यामुळे भारतात ठिकठिकाणी पाऊसही पडतोय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ३० ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी सकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि दिवसभर ढगाळ वातावरण राहील. मात्र गेल्या आठवड्यात आपण पहिले की अनेकवेळा पावसामुळे खेळात व्यत्यय येऊन सामने रद्द झाले आहेत. त्यामुळे जर पुन्हा गुरुवारी पावसामुळे खेळ रद्द झाला तर काय होईल याची चिंता क्रिकेटप्रेमींना लागून राहिली आहे.


सेमी फायनलसाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर सामना ३० ऑक्टोबरला होऊ शकला नाही. तर तो ३१ ऑक्टोबरला खेळवला जाईल. जर राखीव दिवशीही पावसामुळे सामना रद्द झाला तर ऑस्ट्रेलियाला लीग टप्प्यातील गुणतालिकेनुसार अंतिम फेरीचे तिकीट मिळेल.


ऑस्ट्रेलियाने लीग टप्प्यत चांगली कामगिरी केली आहे. पावसामुळे सेमी फायनल झालीच नाही तर ऑस्ट्रेलियाला फायदा होऊ शकतो. भारतीय संघाला मात्र फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवणे हाच एकमेव पर्याय आहे.

Comments
Add Comment

अर्जुन पुरस्काराचे मानकरी जलतरणपटू वीरधवल खाडे सरकारी नोकरीत

मुंबई : राज्याचे नाव क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर नेणारे नामवंत जलतरणपटू आणि माजी तहसीलदार वीरधवल खाडे

BCCI कडून विश्वविजेत्या टीम इंडियाला १३१ कोटींचं बक्षिस , परंतु प्रत्यक्षात एवढे पैसे मिळणार

मुंबई: टी२० विश्वचषक २०२६ मधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला

T20 World Cup 2026 : आयसीसी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश

आयसीसीने टी-२० साठी सर्वोत्तम संघ निवडला असून या संघात चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. संजू

आयसीसी आणि बीसीसीआय कडून खेळाडूंसाठी बक्षिसांचा पेटारा अखेर खुलला

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगलेल्या ICC Men's T20 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय

Sri Lanka Cricket Team : विश्वचषकासाठी श्रीलंकेची जोरदार तयारी; प्रशिक्षकपदी केली 'या' महान खेळाडूची नियुक्ती

श्रीलंका क्रिकेटने दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना नवीन मुख्य प्रशिक्षक

Indian Cricket Team : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा, दोन वर्षात सात ट्रॉफींवर कब्जा

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे