भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सेमी फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कोणाला मिळणार ? जाणून घ्या नियम

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ ची दुसरी सेमी फायनल आज नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. लीग टप्प्यात भारताचा शेवटचा सामनाही याच मैदानावर होता जो पावसामुळे रद्द झाला होता. जर आजची सेमी फायनलची मॅच पावसामुळे रद्द झालंली तर फायनलमध्ये कोणत्या संघाला एन्ट्री मिळणार जाणून घेण्यासाठी आधी नियम समजून घेऊ.


मोंथा चक्रीवादळचा तडाखा हा भारताच्या पूर्व किनापट्टीवर पाहायला मिळतोय आणि त्यामुळे भारतात ठिकठिकाणी पाऊसही पडतोय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ३० ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी सकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि दिवसभर ढगाळ वातावरण राहील. मात्र गेल्या आठवड्यात आपण पहिले की अनेकवेळा पावसामुळे खेळात व्यत्यय येऊन सामने रद्द झाले आहेत. त्यामुळे जर पुन्हा गुरुवारी पावसामुळे खेळ रद्द झाला तर काय होईल याची चिंता क्रिकेटप्रेमींना लागून राहिली आहे.


सेमी फायनलसाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर सामना ३० ऑक्टोबरला होऊ शकला नाही. तर तो ३१ ऑक्टोबरला खेळवला जाईल. जर राखीव दिवशीही पावसामुळे सामना रद्द झाला तर ऑस्ट्रेलियाला लीग टप्प्यातील गुणतालिकेनुसार अंतिम फेरीचे तिकीट मिळेल.


ऑस्ट्रेलियाने लीग टप्प्यत चांगली कामगिरी केली आहे. पावसामुळे सेमी फायनल झालीच नाही तर ऑस्ट्रेलियाला फायदा होऊ शकतो. भारतीय संघाला मात्र फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवणे हाच एकमेव पर्याय आहे.

Comments
Add Comment

Ben Austin Dies News : एक चेंडू, सराव आणि जीवन संपलं…भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी १७ वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलिया : सध्या भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२०

भारत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या T- २० मॅच च्या आधी वाईट बातमी, युवा खेळाडूचा बॉल लागून मृत्यू

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ कांगारूं विरुद्ध पाच टी - २० सामन्यांची मालिका खेळत आहे. या

Shreyas Iyer Health Update : 'स्टार बॅट्समन' श्रेयस अय्यरकडून मोठी अपडेट! गंभीर दुखापतीनंतर ICU मधून भावनिक पोस्ट, चाहत्यांना दिलासा!

मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज (Star Batsman) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या एका गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात उपचार घेत आहे.

हरमनप्रीत कौर आणि तो ऐतिहासिक विक्रम: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी 'त्या' १७१ धावांची चर्चा!

नवी दिल्ली : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या