जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टसचा महाराष्ट्रासोबत करार

देशातले पहिले राज्य; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक


मुंबई : जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टस ग्रुपचा महाराष्ट्र सरकारसोबत ऐतिहासिक करार झाला. तब्बल २ अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे ₹ १६,५०० कोटी) इतकी गुंतवणूक करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य ठरले आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या महत्वपुर्ण करारामुळे महाराष्ट्रासाठी समुद्री क्षेत्रात आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचे दार उघडले आहे. जहाजबांधणी, शिप-ब्रेकिंग, वॉटर ट्रान्सपोर्ट, पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्पोर्ट्स मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक होणार आहे. मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सागरी विकासाला मोठी चालना मिळाली आहे.


या ऐतिहासिक करारामागे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न असून, त्यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र सागरी विकासासाठी जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनत आहे. रोजगारनिर्मिती, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संधींना नवीन दिशा मिळेल. या उपक्रमामुळे महाराष्ट्र राज्य देशाच्या सागरी नकाशावर एक अग्रगण्य आणि महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून उदयास येईल,असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा हिकारू नाकामुरावर पलटवार

मुंबई  : ‘चॅम्पियन्स शोडाउन’ या प्रतिष्ठित रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय विश्वविजेता डी.

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

कबुतरखान्यांसाठी महापालिकेकडून पर्यायी जागांचा शोध

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन मुंबई

बेस्टच्या १५७ नव्या वातानुकूलित बसगाड्यांचे लोकार्पण

बेस्टला सक्षम करण्याचे राज्य सरकारचे ध्येय मुंबई : 'जोपर्यंत बेस्ट उपक्रम ४० टक्क्यांपर्यंत बस

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी - तटकरे

मुंबई : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ

तानसा धरणावर १०० मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प; महापालिकेचे वाचणार वर्षाला १६५ कोटी रुपये

मुंबई (खास प्रतिनिधी) : ​मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तानसा धरणावर आता वीज निर्मिती प्रकल्प उभारला