जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टसचा महाराष्ट्रासोबत करार

देशातले पहिले राज्य; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक


मुंबई : जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टस ग्रुपचा महाराष्ट्र सरकारसोबत ऐतिहासिक करार झाला. तब्बल २ अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे ₹ १६,५०० कोटी) इतकी गुंतवणूक करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य ठरले आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या महत्वपुर्ण करारामुळे महाराष्ट्रासाठी समुद्री क्षेत्रात आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचे दार उघडले आहे. जहाजबांधणी, शिप-ब्रेकिंग, वॉटर ट्रान्सपोर्ट, पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्पोर्ट्स मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक होणार आहे. मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सागरी विकासाला मोठी चालना मिळाली आहे.


या ऐतिहासिक करारामागे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न असून, त्यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र सागरी विकासासाठी जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनत आहे. रोजगारनिर्मिती, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संधींना नवीन दिशा मिळेल. या उपक्रमामुळे महाराष्ट्र राज्य देशाच्या सागरी नकाशावर एक अग्रगण्य आणि महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून उदयास येईल,असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

सोमवार आणि मंगळवारी मुंबईत पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई (३) जलवाहिनीवर, अमर महल भूमिगत बोगद्याच्या (१ व २) शाफ्टला जोडणाऱ्या २५०० मिलीमीटर

मुंबईतले रस्ते धुळमुक्त करण्यासाठी 'ही' योजना राबवणार

मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत

धुळ प्रदुषण वाढले, मुंबईतील ५३ बांधकामांना काम थांबवा नोटीस

मुंबई - मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन

पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांचा कल ‘जनरल मेडिसिन’ कडे

मुंबई (प्रतिनिधी): देशातील पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी २०२५) यंदा विद्यार्थ्यांचा कल एमडी

मल जल प्रक्रिया केंद्रांची कामे जलदगतीने

केंद्र उभारणीच्या कामाच्या कार्यवाहीला वेग देण्याचे निर्देश मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत एकूण ७ ठिकाणी मलजल

बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द करणार

मुंबई : राज्यात बेकायदेशीर पद्धतीने तसेच खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या जन्म-मृत्यू दाखल्यांचे रॅकेट