कर्नाटकात आरएसएसला दिलासा! कॉंग्रेस सरकारच्या 'त्या' आदेशावर खंडपीठाची स्थगिती

कर्नाटक: सरकारी आवारात कोणतेही उपक्रम आयोजित करण्यापूर्वी खासगी संस्थांना पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करणाऱ्या सरकारी आदेशाला धारवाड खंडपीठाने स्थगिती दिली आहे. याबाबत एकल न्यायाधीशाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती नागप्रसन्न प्रसाद यांनी शासन निर्णय देत या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ नोव्हेंबरला ठेवली आहे. यामुळे कर्नाटक काँग्रेस सरकारला उच्च न्यायालयाने धक्का दिल्याची चर्चा सुरू आहे. जमावबंदीच्या या आदेशाबाबत बऱ्याच जणांनी आरएसएसच्या कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यासाठी हा आदेश काढण्यात आल्याचे म्हटले होते.


कर्नाटक सरकारने दहापेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमण्यासाठी परवानगी घ्यावी, असा आदेश काढला होता. याविरोधात पुनश्चैतन्य सेवा संस्थेने याचिका दाखल केली होती. या प्रकरणात याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अशोक हरणहळ्ळी यांनी असा युक्तिवाद केला की, कर्नाटक सरकारचा हा आदेश संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांवर बंधन घालणार आहे." दरम्यान सरकारच्या या आदेशाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती मिळाली आहे.

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने १८ ऑक्टोबर रोजी हा आदेश जारी केला होता. ज्यात सार्वजनिक आणि सरकारी मालकीच्या मालमत्तांचा वापर कशा पद्धतीने केला जाऊ शकतो याबद्दल मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. खाजगी किंवा सामाजिक संघटना सरकारी शाळा, महाविद्यालयांचे मैदान किंवा संस्थेच्या जागेत संबंधित विभाग प्रमुखांच्या लेखी परवानगीशिवाय कार्यक्रम, बैठक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू शकत नाहीत, असे सांगितले होते.



या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे कर्नाटकचे अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले की, "हा सिद्धरामय्या सरकारसाठी मोठा धक्का आहे. प्रियांक खरगे गेल्या काही आठवड्यांपासून आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. मात्र आता उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला तोंड बंद करावे लागेल कारण आज न्यायाचा विजय झाला आहे."

दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर धारवाड खंडपीठाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देईल.

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या