पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल

चिपळूण : पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी चिपळूणमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बोलून दाखवला. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे माझे चांगले मित्र आहेत. या मैत्रीचा उपयोग या महामार्गाच्या कामाच्या पूर्णत्वासाठी करून घेऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


खा. नारायण राणे हे त्यांच्या जनता दरबारनिमित्त चिपळूणमध्ये आले होते. जनता दरबार संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार विनय नातू, भाजप नेते प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजप चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भुरण, शहराध्यक्ष शशिकांत मोदी आदी उपस्थित होते.


खासदार राणे यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना उबाठावर टीकेची झोड उठवली. यावेळी ते म्हणाले की, उबाठा सेनेतील नेत्यांना चांगले काही बोलता येते का? शुद्ध चांगले विचार देता येतात का? असा सवाल उपस्थित करीत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर त्यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ३७० कलम बद्दल बोलायचे. ते कलम गृहमंत्री अमित शहा यांनी रद्द केले, अशा नेतृत्वावर तोंडात काही येते ते बोलतात, असे राणे यांनी यावेळी सांगितले.


यावेळी त्यांनी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, असे सांगताना शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असून ते शेतकऱ्यांना मदत करेल. कोकणातील पिकांच्या नुकसानीसंदर्भातही सर्वेक्षण सुरू आहे. याबाबत लवकरच शासन मदत जाहीर करेल, अशी ग्वाही नारायण राणे यांनी दिली. चिपळूण शहरातील लाल-निळ्या पूर रेषा संदर्भात आपला पाठपुरावा सुरू असून चिपळूणवासीयांना अपेक्षित असलेला लवकरच निर्णय येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Maharashtra Cabinet Meeting : एकाच बैठकीत ६ मोठे निर्णय! परवडणारी घरे उपलब्ध होणार; फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात 'म्हाडा पुनर्विकास' धोरणावर शिक्कामोर्तब

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज, १८ नोव्हेंबर रोजी, राज्य मंत्रिमंडळाची

Hinjewadi Accident News : डंपरच्या जोरदार धडकेत बापलेकीची ताटातूट! मुलीचा जागीच मृत्यू, वडील जखमी; हिंजवडी हादरले

हिंजवडी : पुण्यातील हिंजवडी आयटी परिसरात (Hinjewadi Accident News) अवजड वाहनांच्या अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, काल

Suraj Chavan New House : 'गुलिगत किंग' बनला 'गृहस्थ'! भव्य हॉल, आकर्षक इंटिरिअर अन्... सूरज चव्हाणच्या हक्काच्या घराची 'पहिली झलक' पहाचं!

मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय नाव म्हणजे सूरज चव्हाण. आपल्या खास "झापूक

Ladki Bahin Yojana E- KYC : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! E-KYC ला ४३ दिवसांची मुदतवाढ, काय आहे संपूर्ण प्रक्रिया? वाचा

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' (Majhi Ladki Bahin Yojna) अंतर्गत सुरू असलेल्या ई-केवायसी (E-KYC) प्रक्रियेसाठी सरकारने

इलेक्ट्रिक एसटी बसला राज्यातील द्रुतगती मार्गांवर टोलमाफी

मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याचा ई-शिवाई बसला फायदा मुंबई  : राज्य परिवहन महामंडळाच्या ई-बसला द्रुतगती

५०० कोटींचे रुग्णालय अजित पवारांच्या भाच्याला?

अंजली दमानिया यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे अमेडिया या